शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आठ महिन्यांनी खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा ...

सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा तेल डब्यामागे जवळपास ३०० रुपये कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी दीपावलीपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत गेले. तेलाचे पाऊच तसेच १५ किलोंच्या डब्याचेही दर सतत वाढत होते. एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचची किंमत ९० रुपयांच्या घरात होती. हेच तेल काही दिवसांपूर्वी पर्यंत १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा १५ किलोच्या डब्याचे भाव २८०० रुपयांपर्यंत पोहोचलेले. यामध्ये पामतेल आणि सोयाबीन तेलाचा भाव सूर्यफूल व शेंगदाणा तेलापेक्षा कमी होता. असे असले तरी खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नागरिकांनी सोयाबीन तेलाला पसंती दिली. पण, सोयाबीन तेलाला मागणी वाढल्यानंतर याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून आले.

खाद्यतेलाचे दर सध्या कमी होत असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून पाऊचमागे कमी उतार असला तरी डब्याचा भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे महागाईशी तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. येथून पुढे खाद्यतेलाचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच लवकरच नवीन तेल पिके येणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांतच आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे.

चौकट :

खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर)

खाद्यतेल आधीचे आताचे

सूर्यफूल १०० १८०

सोयाबीन ९० १५५

शेंगदाणा १४० १८०

पाम ८० १२२

.........................................

सोयाबीन तेल डबा २४००

सूर्यफूल तेल डबा २६००

.......................................

गृहिणींचे बजेट कोलमडलेले...

मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहे. ज्या खाद्यतेलाचा एक लिटरचा पाऊच ८० ते ९० रुपयांना मिळत होता, तो १५० रुपयांच्या पुढे गेलेला. त्यातच कोरोना लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांची कामे गेली. त्यांच्या घरात या महागाईची फोडणी चांगलीच बसली. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. त्याचबरोबर सामान्यांना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणात बसला.

...............................................

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल...

दहा वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही शेतात कारळ, भुईमूग पिके घ्यायचो. यामधून घाण्यावर जाऊन तेल काढून घेत होतो. पण, अलीकडील काळात तेलपिके कमी प्रमाणात घेत आहे. त्यामुळे सध्या विकतचे खाद्यतेलच घेत आहोत. पण, महागाईमुळे हे परवडत नाही.

- बापू काळे, शेतकरी

....................

पूर्वीच्या काळी घाण्यावर भुईमूग शेंगा घेऊन जात होतो. त्यामधून तेल तयार करण्यात येत होते. हे खाद्यतेल वर्षभर वापरायचो. हे तेल पुरेसे होत होते. पण, अलीकडील काळात तेलपिकांपेक्षा फळबागांकडे वळलो आहे. त्यामुळे बाजारातून विकतचे खाद्यतेल घेऊन तेच घरात वापरतो.

- तानाजी पाटील, शेतकरी

.............................................................