शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
4
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
5
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
6
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
7
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
8
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
9
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
10
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
12
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
13
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
14
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
15
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
16
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
17
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
18
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
19
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
20
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 

आठ महिन्यांनी खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा ...

सातारा : जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते. पण, मागील आठवड्यापासून दरात उतार आला आहे. तर शेंगदाणा तेल डब्यामागे जवळपास ३०० रुपये कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी दीपावलीपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत गेले. तेलाचे पाऊच तसेच १५ किलोंच्या डब्याचेही दर सतत वाढत होते. एक लिटरच्या खाद्यतेल पाऊचची किंमत ९० रुपयांच्या घरात होती. हेच तेल काही दिवसांपूर्वी पर्यंत १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा १५ किलोच्या डब्याचे भाव २८०० रुपयांपर्यंत पोहोचलेले. यामध्ये पामतेल आणि सोयाबीन तेलाचा भाव सूर्यफूल व शेंगदाणा तेलापेक्षा कमी होता. असे असले तरी खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नागरिकांनी सोयाबीन तेलाला पसंती दिली. पण, सोयाबीन तेलाला मागणी वाढल्यानंतर याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून आले.

खाद्यतेलाचे दर सध्या कमी होत असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून पाऊचमागे कमी उतार असला तरी डब्याचा भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे महागाईशी तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. येथून पुढे खाद्यतेलाचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच लवकरच नवीन तेल पिके येणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांतच आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे.

चौकट :

खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर)

खाद्यतेल आधीचे आताचे

सूर्यफूल १०० १८०

सोयाबीन ९० १५५

शेंगदाणा १४० १८०

पाम ८० १२२

.........................................

सोयाबीन तेल डबा २४००

सूर्यफूल तेल डबा २६००

.......................................

गृहिणींचे बजेट कोलमडलेले...

मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेले आहे. ज्या खाद्यतेलाचा एक लिटरचा पाऊच ८० ते ९० रुपयांना मिळत होता, तो १५० रुपयांच्या पुढे गेलेला. त्यातच कोरोना लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांची कामे गेली. त्यांच्या घरात या महागाईची फोडणी चांगलीच बसली. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. त्याचबरोबर सामान्यांना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणात बसला.

...............................................

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल...

दहा वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही शेतात कारळ, भुईमूग पिके घ्यायचो. यामधून घाण्यावर जाऊन तेल काढून घेत होतो. पण, अलीकडील काळात तेलपिके कमी प्रमाणात घेत आहे. त्यामुळे सध्या विकतचे खाद्यतेलच घेत आहोत. पण, महागाईमुळे हे परवडत नाही.

- बापू काळे, शेतकरी

....................

पूर्वीच्या काळी घाण्यावर भुईमूग शेंगा घेऊन जात होतो. त्यामधून तेल तयार करण्यात येत होते. हे खाद्यतेल वर्षभर वापरायचो. हे तेल पुरेसे होत होते. पण, अलीकडील काळात तेलपिकांपेक्षा फळबागांकडे वळलो आहे. त्यामुळे बाजारातून विकतचे खाद्यतेल घेऊन तेच घरात वापरतो.

- तानाजी पाटील, शेतकरी

.............................................................