शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:57 IST

सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. या धरणांतील पाण्यावर सातारा तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरली की पुढील नऊ महिने चिंता करण्याचे कारण नसते. त्यातच यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. या पावसामुळे प्रमुख धरणांबरोबरच छोटे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत चिंतेचे कारण राहिलेले नाही.

जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. यासाठी धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सध्या धोम, कण्हेर, कोयना आणि उरमोडी या धरणांतून पाणी सोडले जात आहे. तर सध्या कोयना धरणात अजूनही १०० टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर धोममध्ये १२.५९ टीएमसी, कण्हेरमध्ये ९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उरमोडी धरणात जेमतेम सहा टीएमसीच पाणीसाठा झाला होता; पण यंदा धरण भरून वाहिले. त्यातच अजूनही धरण काठोकाठ आहे. या धरणावरच दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजना अवलंबून आहेत. यंदा कोयना धरणही भरल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे.सांगलीसाठी १०५० क्युसेक विसर्गजिल्ह्यातील धोम धरणातून सध्या ७०५, कण्हेर धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याद्वारे ४७५ क्युसेक पाणी विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. तर उरमोडी धरणातून १५० क्युसेक पाणी विसर्ग नदीद्वारे सोडण्यात आलेला आहे. हे पाणीही सिंचनासाठी जात आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कारणांसाठी सोडण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यातील पाणी प्रकल्प स्थिती..

धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण क्षमता (टीएमसीमध्ये)

  • धोम - १२.५९ - ९३.२४ - १३.५०
  • कण्हेर - ९.२४ - ९१.४४ - १०.१०
  • कोयना - १००.२८ - ९५.२८ - १०५.२५
  • बलकवडी - ४.०४ - ९९.०४ - ४.०८
  • तारळी - ५.३४ - ९१.३३ - ५.८५
  • उरमोडी - ९.७९ - ९८.२७ - ९.९६
टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी