शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

देऊरला ११ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या देऊर ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी चार पॅनेलमधून २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले ...

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या देऊर ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी चार पॅनेलमधून २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी शेतकरी पॅनेलने आठ जागी, तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर यंदा पहिल्यांदा आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुधाई देवी परिवर्तन पॅनेलने आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर वाॅर्ड क्र ४ मधून माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर कदम यांचा मुलगा विकास कदम अपक्ष म्हणून राजकीय आखाड्यात पहिल्यांदा उतरला आहे. याशिवाय याच वाॅर्डातून सागर कदम हा दुसरा अपक्ष नशीब आजमावत आहे. तसेच सर्व समाजातील युवकांनी निर्माण केलेल्या देऊर विकास आघाडीमधूनही आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असल्याने यंदा सत्तेच्या गणिताचा आकडा कोणा एकाला गाठता येईल का? हा प्रश्न आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी पॅनेल व श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने एकत्रितपणे जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढत श्री मुधाई मंदिरात २१ नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. यानंतर हनुमान मंदिरासमोर या दोन्ही पॅनेलची कोपरा सभा झाली. यावेळी दोन्ही पॅनेलच्या ११ उमेदवारांनी आपला परिचय करून दिला.

तर गुरुवारी सकाळी देऊर विकास आघाडीनेही जोरदार शक्तिप्रदर्शन करत श्री मुधाई मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री मुधाई देवी परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा रविवारी प्रारंभ होत आहे. यावेळी गेली पाच वर्षांतील सत्ताधारी पॅनेलच्या कारभाराची लक्तरे बाहेर काढली जाणार असल्याने पुढील पाच दिवसांत प्रचाराचा वेग वाढणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना खूश करण्यासाठी दारू आणि पैसा वाटप करण्याचाही उद्योग काही लोकांकडून होणार असल्याने अशा लोकांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहणे आवश्यक आहे. एकूणच अशा भूलथापांना देऊर गावातील जागरूक मतदार कोणत्याही प्रकारे भुलणार नसल्याने हे प्रयत्न निरर्थक जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चौकट...

पहिल्याच दिवशी फलकयुद्ध!

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण गावात फलकयुद्ध सुरू झाले आहे. गावातील चौकाचौकांत तिन्ही पॅनेलचे फलक झळकू लागले आहेत. आता पुढील पाच ते सहा दिवसांत सर्वच उमेदवार मतदाराच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना आपलंसं करण्यावर भर देतील, तर सत्ताधारी विरोधात श्री मुधाई देवी पॅनेल व श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल सत्ता स्थापन्यासाठी आक्रमक होणार आहेत.