शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

......... विक्रेत्यांचे अतिक्रमण सातारा : शहरातील विविध चौकांमध्ये भाजीविक्रेत्यांनी फूटपाथवर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविले आहे. कोरोनाकाळात भाजी मंडया ...

.........

विक्रेत्यांचे अतिक्रमण

सातारा : शहरातील विविध चौकांमध्ये भाजीविक्रेत्यांनी फूटपाथवर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविले आहे. कोरोनाकाळात भाजी मंडया बंद ठेवण्यात आल्या होत्या. या काळात भाजीविक्रेते परवाना काढून फिरत होते. काही भाजीविक्रेते चौकात बसून व्यवसाय करीत होते. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असल्याने त्यावेळी ते या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करीत होते.

........

दिंडीचे प्रस्थान

सातारा : ‘ओम श्री साईनाथ की जय’च्या जयघोषात केळकर ते शिर्डी पायी दिंडी सोहळा व भक्तिपूर्ण वातावरणात शिर्डीकडे रवाना झाला. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने सामाजिक आरोग्य जपण्यासाठी मोजक्याच पंचवीस भक्तांचे केळकर ते शिर्डी साई दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी साईपालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

...........

नागरिकांची कुचंबणा

वडूज : वडूज (ता. खटाव) येथील बाजार पटांगण परिसरात स्वच्छतागृह नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. वडूज हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरामध्ये आसपासच्या गावांतून कामासाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बाजार पटांगण परिसरामध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारात ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या संख्येने शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात.

........

रॅलीद्वारे प्रबोधन

सातारा : जावळी तालुक्यात विपुल वनसंपदा असून, काही समाजकंटक गैरसमजुतीतून विनाकारण वणवे लावत आहेत. त्यामुळे दुर्मीळ औषधी वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा यामध्ये बळी जात आहे. वणवे रोखण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जावळी तालुक्याचे वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी यांनी केले. बहुले (ता. जावळी) येथे वनविभागाच्या वतीने वन-वणवा जनजागृती सप्ताह प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

.......

वाहनधारकांची कसरत

सातारा : सातारा शहराच्या विकासातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला ग्रहण लागले आहे. सुमारे ६०० हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या असलेल्या वसाहतीतील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक ठिकाणी अरुंद असणारे रस्ते, पार्किंगचा उडालेला बोजवारा यांमुळे औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे.

.......

बिल भरण्याचे आवाहन

सातारा : शहर व उपनगरांतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत लष्कर पाणीपुरवठा केंद्राद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या ग्राहकांनी आपले थकीत पाणीबिल दि. २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

दारूबंदी कागदावर

सातारा : सुमारे अठरा वर्षांपूर्वी जावळी तालुका दारू दुकानमुक्त करण्यासाठी आनेवाडी येथील महिला रणरागिणींनी खऱ्या अर्थाने लढा देऊन तालुका दारूमुक्त केला होता. मात्र दारूबंदीसाठी मतदान होऊन महिलांनी बंद केलेल्या दारूची आनेवाडी गावाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. कागदावर दारूबंदी आणि गावात खुलेआम दारूविक्री, अशी या गावातील अवस्था आहे.

........

टोलनाक्यावर मार्गदर्शन

सातारा : आपल्या घरी आपली रोज वाट पाहणारे जिवलग आहेत; त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात आनेवाडी टोलनाक्यावर करण्यात आली.

..........

रानगव्यांचा वावर

सातारा : वनक्षेत्र व परिसरामध्ये आढळणाऱ्या मानवी वस्तीत रानगव्यांचा वावर वाढत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानगव्यांचे दर्शन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून खटाव, वाई आणि खंडाळा या तालुक्‍यांतही रानगव्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.