शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खंबाटकीत नव्या बोगद्याऐवजी उड्डाणपूल उभारावा, खंडाळ्यातील शेतक-यांनी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:33 IST

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे.

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे. विकासात्मक कामे झाली पाहिजेत; पण आमच्या घरावर नांगर फिरवून नका, जे काम करणारे आहेत, त्यांनी शेतक-यांना विश्वासात घेऊन रस्त्याऐवजी उड्डाणपुलाचा मार्ग अवलंबवावा, अशा प्रतिक्रिया शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, यासाठी खंबाटकी घाटातील बोगद्याशेजारी आणखी एक बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी येथील स्थानिक शेतक-यांच्या आणखी जमिनी जाणार असल्याने हा बोगदा शेतक-यांच्या मुळावरच बसणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.नवीन होणारा बोगदा व त्यानंतर दोन किलोमीटर लांबीचा रस्ता त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे २१० फूट जागा सोडावी लागणार आहे. शेतक-यांच्या संमतीने ही जागा घेण्यात येणार असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना शेतक-यांच्या उपरोक्ष जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. मात्र, यासाठी खंडाळा आणि वाण्याची वाडी येथील शेतक-यांची आणखी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. या अगोदर राष्ट्रीय महामार्ग तसेच धोम-बलकवडीच्या प्रकल्पासाठी स्थानिक शेतक-यांनी जागा देऊन योगदान दिले आहे. आता या रस्त्यासाठी जमिनी दिल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे आणखी किती वेळा जागा शासनाला द्यायच्या, असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.नवीन प्रकल्पासाठी आणखी जमिनी घेतल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहेत. जमीन मोजणीच्या नोटिसा शेतक-यांना दिलेल्या नाहीत. खासगी एजन्सीच शेतक-यांना भेटत आहे. त्यामुळे प्राधिकरणाची भूमिका संदिग्ध आहे. ८२ शेतकºयांच्या जमिनी जात असल्याने हे शेतकरी देशोधडीला लावून प्रकल्प उभारायला आमचा विरोध आहे. यापेक्षा नवीन बोगदा ते जुन्या टोलनाक्यापर्यंत उड्डाण पूल बनविल्यास जमिनी वाचतील व प्रकल्पाचा खर्चही वाचेल.- शरदकुमार दोशी, नगराध्यक्ष खंडाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर