शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जोर ग्रामस्थांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

वाई : ज्या वाटेने प्रशासनही वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जोर गावात पोहोचू शकले नाही, त्याच वाटेने जिवाची पर्वा ...

वाई : ज्या वाटेने प्रशासनही वाई तालुक्यातील पश्चिम भागातील जोर गावात पोहोचू शकले नाही, त्याच वाटेने जिवाची पर्वा न करता अडचणीत असलेल्या जोर ग्रामस्थांच्या मदतीसाठी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे व त्यांचे युवक काँग्रेसचे पथक जोरमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले.

वाई तालुक्यातील जोर येथे सोमवार, २६ रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दौरा केला. प्रशासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे ग्रामस्थांनी फोन करून विराज शिंदे व बापूसाहेब शिंदे यांना सांगितले. या दोघांनी लगेच निर्णय घेतला. काहीही झाले तरी आपल्या अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जायचेच. तब्बल बारा ते तेरा किलोमीटर भर पावसात पायपीट करत चिखल तुडवत, त्यामध्ये वरून पडणारा धो-धो पाऊस, वाहून गेलेले तेरा पूल, ओढ्यातून धो-धो वाहणाऱ्या पाण्यामधून, तुटलेल्या रस्त्यांवरून वाट काढत विराज शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे तसेच इतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जोर येथे पोहोचले. पाच दिवस झाले एक महिला व तिचा मुलगा अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. अजूनही ते बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी सर्व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी भिलारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद अनपट, गणेश शिंदे, विकास जाधव, समीर जाधव, सुरेश वाघ, सनी शिंदे, संजय जाधव, गणेश जाधव, ज्ञानदेव कोंढाळकर, शिवाजी राऊत, निशांत म्हेत्रे, जोतिराम भोसले व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.