शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

शिवसेनेचे ‘अंघोळ घालो’ आंदोलन : पोहोण्याच्या तलावाची दुरुस्ती करून खुला करण्याची मागणी

सातारा : उन्हाळ्याची सुटी म्हटलं की पाण्यात मनसोक्त डुंबावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण आता नदी, विहिरी पूर्वीसारख्या खळाळत नाहीत. कमी पर्जन्यमानामुळं नदीपात्रात पाण्याचा ठिपूसही नजरेस पडत नाही. पिण्याच्या पाण्याची जिथं ओरड, तिथं पोहोण्यासाठी पाणी कुठून येणार? अशावेळी मुलांना पोहोण्याचा आनंद मिळविण्यासाठी हक्काचं एकमेव ठिकाण होतं ते नगरपालिकेचा पोहोण्याचा तलाव. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव नादुरुस्त असून बंद आहे. या तलावाची दुरुस्ती करून मुलांना पोहोण्यासाठी खुला करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगरपालिकेच्या पायरीवर मुलांना अंघोळ घालून प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले. उपतालुकाप्रमुख हरिदास मोरे, ज्ञानेश्वर नलवडे, आतिष ननावरे, विभागप्रमुख नंदू केसरकर, रोहिदास वाघ, उपशहरप्रमुख प्रवीण शहाणे, रमेश बोराटे, मंगेश जाधव, संतोष शेलार, बापू तोरस्कर, राजू शेडगे, सागर दयाळ, संतोष शेंडे, बापू नलावडे, दत्ता नलावडे, मनोज नलावडे, अजित नलावडे, बबन फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांची पळापळशिवसेनेच्या वतीने पालिकेत ‘अंघोळ घालो आंदोलन’ सुरू असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आपल्या केबिनमध्ये बसून न राहता आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी किशोर पंडित यांनी बापट यांना निवेदनाची प्रत देऊन पोहोण्याचा तलाव दुरुस्त करून त्वरित खुला करावा, अशी मागणी केली. त्यानंतर बापट यांनी तो अधिकार मला नाही, असे सांगितले. यावर पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत ही बाब तुमच्या अधिकारात येते. परंतु तुम्ही हात झटकत आहात, असा आरोप करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर बापट यांनी हा विषय सर्व नगरसेवकांनी सभेत उपस्थित केल्यास तसा प्रस्ताव पुढे पाठविता येईल, असे सांगितले. नगराध्यक्षांच्या गाडीलाही अंघोळ ‘अंघोळ घालो आंदोलन’ झाल्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आंदोलक पालिकेबाहेर पडत असतानाच गेटसमोर लावलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीलाही बादलीभर पाण्याने आंघोळ घालून घोषणाबाजी करण्यात आली.घरच्या बादलीत पालिकेचे पाणी!गेल्या चार दिवसांपासून या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी घरूनच बादल्या आणल्या होत्या. पालिका गेटवर असणाऱ्या नळाचे पाणी बादलीत भरून मुलांना अंघोळ घालण्यात आली.