शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सुगीत मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:29 IST

औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस ...

औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस सामोरे जावे लागत आहे. मजुरांचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुगी उरकण्याच्या मार्गावर शेतकरी वर्ग असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. परिणामी टंचाई भासत होती.

गेल्या दोन दशकांमध्ये शेती करण्यासाठी त्या कुटुंबातील चार-पाच सदस्य नेहमी तयार असत. शेतकरी मजूर मिळाले नाही तरी आपल्या शेतातील सुगी तो उरकत असे; पण आता याउलट चित्र दिसून येत आहे. शेतकरी कुटुंबातील एखाद‌्दुसरा सदस्य शेतात राबताना दिसतो व बाकीची कामे तो शेतमजूर यांच्याकडून करून घेत आहे. ऐन सुगीच्या काळात या मजुरांना सोन्याचा भाव येतो. त्यामुळे मजुरांच्या विनंत्या करता-करता शेतकऱ्यांना घाम फुटू लागला आहे.

गहू, ज्वारी काढण्यासाठी मजुरांची दिवसाची हजेरी ४०० ते ५०० रुपयांच्या आसपास आहे; तर काही मजूर टोळ्या करून ज्वारी उपटून देत आहेत. मात्र त्यांचा एकरी दर हजारोंच्या घरात आहे. ज्वारी उपटल्यानंतर तिची काटणी, मळणी, पेंढ्या बांधणी व गंज लावणे या सर्वांच्या खर्चाचा हिशेब काढला तर ती बाजारातून विकत आणल्यासारखीच आहे. कधी-कधी तर उत्पादनापेक्षा खर्च अधिक येत आहे. त्यामुळे बळिराजा अक्षरशः वैतागला आहे.

(चौकट)

गहू काढण्यासाठी मशीनकडे कल

मजुरांची टंचाई असल्याने सध्या औंध परिसरात गहू काढण्याच्या हार्वेस्टर मशीनकडे शेतकऱ्यांचा कल आहे. एक एकर गहू काढण्यासाठी एका तासाच्या आत वेळ लागत असल्याने अवकाळीच्या फटक्यापासून वाचण्यासाठी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी मशीनकडे वळला आहे.

चौकट:-

पैरा पद्धतीवर भर

पैरा ही पद्धत शेतकऱ्यांना परवडणारी आहे. आपली दोन-तीन माणसे व पैरेवाल्यांची दोन-तीन माणसे मिळून आपले काम त्यांनी व त्यांचे काम आपण करायचे; यामुळे खर्चही नाही व कामही आटोपते; परंतु सगळीकडे पैरा चालतो असे नाही. पूर्वी बैलाने शेती करतानासुद्धा मध्यमवर्गीय शेतकरी बैलाचा पैरा करीत असे.

२१औंध

फोटो:-संग्रहित छायाचित्र