शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या विरहानं तिनं घर सोडलं; पण...

By admin | Updated: August 11, 2015 00:01 IST

रिक्षाचालक, पोलिसांच्या सावधगिरीमुळं चिमुकली सुखरूप स्वगृही

शेखर जाधव - वडूज -पंधरा दिवसांपूर्वी आजी गेली. तिच्या विरहानं अकरा वर्षांची चिमुकली एकटी झाली. याच विरहवेदनेमुळं तिनं घर सोडलं खरं; पण त्यानंतरचा तिचा दिवसभराचा प्रवास तिची कसोटी पाहणारा ठरला. रहिमतपूर येतील कन्या प्रशालेमध्ये सातवीत शिकणारी ऊर्मिला शरद कुंभार हिला एकूण पाच बहिणी. दोघींची लग्नं झालेली. एक बहीण शुभांगी बारावीत शिकतेय. दुसरी कोमल नववीत आहे. या तिघींच्यांत किरकोळ कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. सर्वांत लहान ऊर्मिला असल्यामुळे थोरल्या दोघी तिला रागवायच्या. त्यावेळी लाडकी आजीच ऊर्मिलाची बाजू आजी घ्यायची. अशी आजी अचानक जगातून निघून गेल्यामुळं ऊर्मिलाला घरात एकटं वाटू लागलं. आता आपली बाजू घेणारं कुणी नाही, असा विचार तिच्या मनात येऊ लागला.रविवारी (दि. ९) सकाळी ९ वाजता डब्यात साठविलेले १४० रुपये घेऊन ती रहिमतपूरहून वडूजला जाणाऱ्या एसटीत बसली. बसमध्ये कुणी ओळखणारं भेटलंच तर त्याला सांगायला बरीच कारणं तिनं तयार ठेवली होती. परंतु बसमध्ये ओळखीचं कुणीच नव्हतंं. कुठं जायचं, हे निश्चित नसतानाही तिनं हे पाऊल उचललं होतं. आपल्या नशिबी पुढे काय आहे, हेही तिला ज्ञात नव्हतं. इकडे आई-वडील ,दोन बहिणी आणि नातलग तिचा शोध घेऊ लागले.रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळा असल्याचा संशय आल्याने त्याने रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. हवालदार शांताराम आेंबासे यांना ऊर्मिलेची कहाणी रिक्षावाल्याने सांगतिली. ‘आम्ही सर्वजण गेल्या महिन्यापासून इथेच राहतो. वडील सातारला पेट्रोलपंपावर कामाला असतात,’ असं ऊर्मिलानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी विचारल्यावर पूर्ण नावही सांगितलं. ‘माझी बहीण खटाव कालेजमध्ये अकरावीत शिकत असून तिने मला घरी जाण्यास सांगितलंय; पण मला घर सापडेना,’ असं ती म्हटल्यावर पोलिसांनी तत्काळ खटाव कालेज गाठलं. परंतु रविवार असल्याने कालेजला सुटी होती.मग मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा तिने मावशीबद्दल आणि साताऱ्यात राजवाड्याजवळ पडकं घर असल्याचं सांगितलं. त्या दिशेनंही पोलिसांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर संपर्क साधला; पण हाती काहीच लागेने. नंतर महिला पोलीस आशाताई काळे यांनी तिला नाष्टा आणून दिला आणि पुन्हा चौकशी केली. ही मात्राही लागू न झाल्यानं ठाणे अंमलदार धनाजी वायदंडे यांनी तिला पेन दिलं आणि ‘तुला आठवेल तो मोबाइल नंबर लिही’ असं सांगितलं. कागदावर तिने भरकन वडिलांचा नंबर लिहिला आणि अखेर ती रहिमतपूरच्या शरद कुंभार यांची मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. रहिमतपूरहून रात्री उशिरा ऊर्मिलाचे वडील आणि नातलग आले. पोलीस ठाण्यातले सोपस्कार उरकून ऊर्मिलाला घेऊन गेले. जाता-जाता पोलीस कर्मचारी शांताराम ओंबासे, धनाजी वायदंडे एवढंच म्हणाले... ‘नशीब बलवत्तर म्हणूनच ती ऊर्मिला वडूजमध्ये आली.’ मुला-मुलींचे अपहरण होण्याच्या घटना वाढत असताना ऊर्मिलाने उचललेले हे पाउल आत्मघातकीच म्हणावं लागेल. सुमारे तीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूजनगरीचा बसस्थानकावर ऊर्मिला सकाळी ११ वाजता पोहोचली आणि रिक्षाकडे धावली. रिक्षावाल्याने ‘कुठं जायचंय’ विचारलं असता ‘सरळ चला’ असं तिनं सांगितलं. रिक्षा कर्मवीरनगरमध्ये आली तेव्हा रिक्षाचालकाने पुन्हा विचारलं. नेमकं उत्तर न मिळाल्याने संभ्रमावस्थेत सापडलेल्या रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळाच असल्याची चाहूल लागली.