शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांच्या खिशाला लागली कात्री; टोमॅटोची लाली वाढलेलीच, लसूण-आले आवाक्याबाहेर

By नितीन काळेल | Updated: July 17, 2023 13:54 IST

मिरची तिखटच : टोमॅटोची लाली वाढलेलीच; लसूण, आले आवाक्याबाहेर

सातारा : जिल्ह्यात भाज्यांचे उत्पादन कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली असून बहुतांशीचे दर ८० ते १०० रुपयांच्या घरात आहेत. यामध्ये एक लिटर डिझेल येत आहे. तर मिरची तिखटच असून टोमॅटोची लालीही वाढलेली आहे. त्याचबरोबर लसणाचा किलोचा दर १०० रुपयांवर तर वाटाणा, आले दीडशे रुपयांवर गेला आहे. भाज्यांच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, वाई, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यात तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. येथील भाजीपाला स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेण्यात येतो. तसेच बाजार समितीतही विक्री करण्यात येते. त्याचबरोबर अनेक शेतकरी पुणे-मुंबईच्या मार्केटमध्ये वाहनांतून भाजीपाला नेतात. या भाज्यांचा दर आवकच्या प्रमाणात ठरतो.सध्या भाज्यांची आवक कमी आहे. तसेच काही भागात पावसाची दडी असल्याने नवीन भाजीपाला बाजारात येत नाही. परिणामी भाज्यांचे दर आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. यामुळे याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे. कारण, कोबी सोडला तर कोणतीही भाजी स्वस्त नाही. बहुतांशी भाज्याचे दर हे १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर काहींनी दीडशेचा टप्पा पार केला आहे. या भाज्यांच्या दरात एक लिटर पेट्रोल-डिझेल येत आहे.

भाज्या - दर रुपयात (किलोचे)वांगी           ६० ते ८०टोमॅटो        ८० ते १२०कोबी          ३० ते ४०फ्लाॅवर       ६० ते ८०दोडका       ६० ते ८०कारली        ६० ते ८०मिरची         ८० ते १००ढबू              ६० ते ८०भेंडी            ६० ते ८०शेवगा          ६० ते ८०वाटाणा         १०० ते १५०काळा घेवडा   १०० ते १५०

आले १५० रुपये किलो...सध्या आलेल्या चांगला दर मिळत आहे. किलोचा भाव दीडशे रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे १० रुपयाचे आले घ्यायचे झालेतरी एक-दोन तुकडे मिळत आहेत. या आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.

वाटाण्याला क्विंटलला १६ हजार...

वाटाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रथमच क्विंटलचा भाव १६ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला १० हजारांपासून दर मिळत आहे. यामुळे वाटाणा पाव किलो घ्यायचा झाला तर ४० रुपये मोजण्याची वेळ आलेली आहे. तर काळा घेवड्याला क्विंटलला १५ हजारापर्यंत दर मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvegetableभाज्या