शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

६४७ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

By admin | Updated: November 8, 2015 23:41 IST

शशिकांत शिंदे : अधिकारी, शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

कोरेगाव : भूविकास बँकेचे कर्ज भरलेल्या सातारा तालुक्यातील निगडी आणि वर्णे येथील अनुक्रमे श्रीकृष्ण व काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६४७ शेतकरी सभासदांनी कर्ज भरले असल्याने त्यांचा सातबारा उतारा तातडीने कोरा करण्यासाठी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. सलग दहा वर्षे या विषयावर लढा दिला आणि शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले असल्याने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये निगडी व वर्णे येथील शेतकरी सभासदांची बैठक आ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम, बँकेचे व्यवस्थापक सोनावणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आ. शिंदे यांनी सर्वप्रथम या शेतकऱ्यांनी कर्जे भरली आहेत, त्यांचे सातबारा कोरा करण्याबाबत तातडीने संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, असे निर्देश डॉ. कदम यांना दिले. शिंदे म्हणाले, ‘जावळीतून आमदार असताना त्या तालुक्यातील पाणी योजनांबाबत प्रयत्न केले. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्यानंतर शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन एकरकमी परतफेड योजनेचा अध्यादेश काढले आणि त्याचा लाभ शेतकरी सभासदांना झाला. या योजनेला मुदतवाढ देखील देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब होती. या योजनेअंतर्गत निगडी येथील श्रीकृष्ण पाणीपुरवठा संस्थेच्या ५३७ सभासद शेतकऱ्यांनी १ कोटी ८६ लाख ३७ हजारांचे कर्ज घेतले होते. बँकेने ३३१ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत २ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये वसूल केले आहे, तर वर्णे येथील काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६७३ सभासदांनी ३ कोटी ४७ लाख रुपये कर्ज घेतले होते. बँकेने ३१६ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत ३ कोटी ९६ लाख ७४ हजार रुपये वसूल केले आहेत. त्यांचे सातबारा उतारे कोरे होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश द्यावेत,’ अशा सूचना आ. शिंदे यांनी बैठकीत दिल्या. उर्वरित शेतकऱ्यांबाबत शासनाने तातडीने पावले उचलून निर्णय घ्यावा, यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून, चर्चा करणार आहे. त्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ मुद्दल रक्कम घेण्याबाबत प्रयत्न ‘भूविकास बँकेचे कर्ज थकित झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने बोजे चढविले आहेत. वाढते व्याज आणि व्याज मुद्दलीकरण, या विषयावर शासनाकडे सातत्याने लढा दिला. या विषयावर संबंधित मंत्र्यांकडे विशेष बैठका घेतल्या आणि एकरकमी परतफेड योजनेबाबत अध्यादेश काढण्यास शासनाला भाग पाडले. सलग दहा वर्षे या विषयावर मी काम करत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल वसूल केले जावे, यासाठी प्रयत्न करणार असून, हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे,’ असे आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.