शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

काेराेनाकाळात जिल्ह्यात ५१ मुली सैराट; २८ घरी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून पळून गेली असल्याचे समोर आले आहे; तर यातील केवळ २८ मुली घरी परतल्या आहेत. काही मुलींना पोलिसांना शोधावे लागले.

पूर्वीची ॲरेंज मॅरेजची पद्धत सध्याच्या काळात हळूहळू लुप्त होतेय की काय, अशी भीती समाजमनातून व्यक्त होत आहे. हल्लीची तरुणाई स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी ही पिढी असल्यामुळे आपल्या भावी आयुष्याचा कोण जोडीदार असेल, याचा निर्णयही हीच पिढी घेत आहे. वर्षभरापूर्वी कोराेनाने जिल्ह्यात प्रचंड कहर माजविला होता. असे असतानाही जिल्ह्यातून २८ मुली घरातून गायब झाल्या होत्या. काही पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली; तर काही पालकांनी मुलीचा शोध न घेणेच पसंत केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मात्र, पोलिसांच्या मागे चांगलचा ससेमिरा लावला.

१५ मुलींचा शोध लागेना

घरातून निघून गेलेल्यांपैकी काही मुली सज्ञान आहेत. या मुलींनी ‘मी माझ्या मर्जीनुसार लग्न केले आहे,’ असे सांगितले आहे. त्यामुळे अशा मुलींचा शोध पोलिसांनी थांबविल्यात जमा आहे.

पोलिसांचाही नाइलाज

अनेकदा मुले-मुली घरातून पळून गेल्यानंतर पालक अस्वस्थ होतात. दोघे सहमतीने पळून गेले असले तरी त्यांना शोधण्याचा आग्रह घरातील लोक धरत असतात. त्यामुळे पोलिसांना अशा पळून गेलेल्या मुलांना शोधावेच लागते. इतर गुन्ह्यांचा तपास करीत पोलिसांना सैराट मुला-मुलींचा शोध घ्यावा लागतो.

२३ मुलेही बेपत्ता

काही मुले प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली आहेत; तर काही मुलांनी काैटुंबिक कलहातून घर सोडले आहे. ‘मिसिंग’ची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस युवकांचा बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुले सापडत नाहीत.