शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

जिल्ह्यात २९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 3:04 PM

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे२९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली २५ हजार लोकांना २५ टँकरने पाणीपुरवठा

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली.

दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते. पण यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर झाले. सुरुवातीला खटाव तालुक्यात टँकर सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाटण, वाई आणि माण तालुक्यांत टँकर सुरू झाले. सध्या सर्वच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माणमध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. सध्या ४ गावे आणि १७ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ४ हजार ३०७ लोक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील ३ गावे आणि ४ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या या तालुक्यातील १ हजार ६७३ नागरिक आणि १ हजार ३५ पशुधन टँकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यातील ४ गावांनाही टंचाईची झळ बसत आहे. तसेच पशुधनासाठीही पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २ टँकर सुरू आहेत. वाई तालुक्यातही ३ गावे व ३ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. तसेच पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतही टंचाई आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर