शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुख्य धरणे भरण्यासाठी १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात धुवाँधार पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, गेल्या दीड महिन्यात तुरळक प्रमाणात ...

सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात धुवाँधार पाऊस झाल्यानंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, गेल्या दीड महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तसेच सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख सहा धरणे भरण्यासाठी अजूनही १६ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या या धरणांत १३२ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फ्लो होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नद्या पात्र सोडून वाहात होत्या. त्यामुळे आजुबाजुच्या गावात आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही धरणे वेळेत भरली होती. यावर्षी मात्र, धरणे भरण्यास उशिर झालेला आहे. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. पावसाळा संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

जुलै महिन्यात पश्चिम भागात तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आलेले. तसेच इतर धरणांतही पाणीसाठा वाढलेला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागला. सध्या पावसाची उघडीप आहे. त्यामुळे धरणांत मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणात १४४.८३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो १३२ टीएमसी इतका आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा मोठ्या प्रमाणात टिकून असला तरी ती भरणे महत्त्वाचे आहे. १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ९३ टीएमसीवर पाणीसाठा आहे. हे धरण भरण्यासाठी अजून ११ टीएमसीच्या वर पाणी आवक आवश्यक आहे. सध्या पावसाची उघडीप कमी आहे, तर धरणात आवक अत्यल्प आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाचीच आवश्यकता आहे. इतर धरणे भरण्यासाठी चांगला पाऊस आवश्यक आहे.

चौकट :

पूर्व भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा...

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात साठा आहे. ही धरणे भरली नसली तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. याला कारण म्हणजे पावसाने लावलेली चांगली हजेरी. पण, पूर्व माण, खटाव या तालुक्यातील तलाव, ओढे, बंधारे, कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरीही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता खरीप हंगामातील पिकेही चांगली आली आहेत. या पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे.