शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

येरळा, अग्रणी, बोर, माण नद्यांचे पात्र कोरडे; सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील गंभीर चित्र

By शीतल पाटील | Updated: August 9, 2023 18:39 IST

प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही

सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कृष्णा, वारणा या दोन नद्या दुथडी भरून वाहत असताना येरळा, अग्रणी, बोर या दुष्काळी पट्ट्यातील नद्याचे पात्र मात्र कोरडेच असल्याचे गंभीर चित्र आहे. प्रशासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नदी पुनर्जीवनाचा कार्यक्रमाची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. यंदा येरळा, अग्रणी, माण, बोर नदीकाठच्या जनतेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शकत्या आहे. त्यातील येरळा व अग्रणी नदीला टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचा काही प्रमाणात आधार आहे.जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस व मिरज तालुक्यातील काही भागाला पावसाळ्यात दरवर्षी पुराची भीती सतावत असते. याच काळात येरळा, अग्रणी, माण, बोर या नदींचे पात्र मात्र कोरडेच असते. या नद्या बारमाही कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यापैकी येरळा नदीला ताकारी- टेंभुमुळे, तर अग्रणी नदीला म्हैसाळच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.

येरळा नदीयेरळा नदी कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी आहे. नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ टेकडीवर झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, पलूस, तासगाव या तालुक्यांतून ८५ किलोमीटरचा प्रवास करीत येरळा नदी ब्रह्मनाळजवळ कृष्णा नदीत मिसळते. या नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीमध्ये टेंभू ताकारीचे पाणी सोडले जाते. सध्या नदीत बांधलेल्या बंधाऱ्यांत थोडेफार पाणी दिसून येते. तूरची, ढवळी परिसरात मात्र नदीचे पात्र कोरडेच आहे. वसगडे बंधाऱ्यात थोडेफार पावसाचे पाणी आहे.

अग्रणी नदीखानापूर तालुक्यातील तामखडी येथे उगम पावणाऱ्या अग्रणी नदीचे खोरे खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात विस्तारले आहे. ही नदी तशी कोरडीच म्हणावी लागेल. टेंभूच्या पाण्यामुळे बेनापुर, सुलतानगादे, करंजे बंधाऱ्यापर्यंत पाणी असते. त्यानंतर गव्हाणपर्यंत नदीचे पात्र कोरडे आहे. गव्हाणमध्ये म्हैशाळ योजनेचा पाचवा टप्पा असून, लिंगनूर बाजूने सिंचन योजनेचे पाणी येते. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात नदीचे पात्र पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत आहे.

बोर नदीजत तालुक्यातील दुष्काळाची मूक साक्षीदार असलेली बोर नदी पावसाळ्यातही कोरडीच आहे. यंदा जत तालुक्यात पाऊसमानही कमी झाले आहे. नदीचे पात्र ठणठणीत आहे. परतीच्या पावसात या नदीला थोडेफार पाणी असते. तेही आठ - दहा दिवसांतच निघून जाते. यंदाही परतीच्या पावसाकडे बोर नदी खोऱ्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.

माण नदीजिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यातून वाहणारी माण नदी नेहमीच कोरडी असते. ‘बारमाही कोरडी नदी’ म्हणून तिचा उल्लेख होतो. यंदाच्या पावसाळ्यातही नदीला पाणी नाही. नदीजोड प्रकल्पातूनच माण नदी प्रवाहित होऊ शकते.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी