शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन

By अशोक डोंबाळे | Updated: July 8, 2024 17:59 IST

शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला

सांगली : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नाबाबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शक्तिपीठ प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या सोबत मी असेल, असे आश्वासन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी 'शक्तिपीठ' शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.सांगलीत आज, सोमवारी खासदार शरद पवार आले होते. यावेळी ‘शक्तिपीठ’ शेती बचाव कृती समितीचे नेते आणि किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, सतीश साखळकर, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, शेतकरी कामगार जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, उमेश एडके आदी उपस्थित होते. उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, सतीश साखळकर यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील १९ गावातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. मी सांगलीत आलो असून शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागत आहे. या शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.यावेळी विष्णू पाटील, अधिक पाटील, अनिल पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, दिनकर श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, एकनाथ कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.महापुराचा धोकाशक्तिपीठ महामार्गासाठी मिरज तालुक्यातील कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी गावे बाधित होणार आहेत. कृष्णा नदीवर मोठा पूल होणार असून त्यास मोठ्या प्रमाणात भराव पडणार आहे. कर्नाळ ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही. पाऊस मोठा झाल्यास महापुराचा मोठा धोका नदीकाठच्या गावांसह सांगली, मिरज शहरांना आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदे