शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

करमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:28 AM

Shirla Dam Water Sangli :  शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.

ठळक मुद्देकरमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार

विकास शहाशिराळा  :  तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.तालुक्यातील पावलेवाडी नं १ , पावलेवाडी नं २ , बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं १ , शिरशी नं १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी , पानुम्बरे तर्फ शिराळा नं २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १००%, चव्हाण वाडी नं.१ ,गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं २ , वाकुर्डे खुर्द या मध्ये (३०%), शिरसटवाडी , गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं २ या मध्ये (३५%) ,पाडळी , लादेवाडी या मध्ये (४०%) येळापूर ( चव्हानवाडी) , तडवळे ( वाडदरा) ( कुंदनाला) , निगडी (महारदरा), धामवडे ,वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द या मध्ये (४५%) मेणी ( संकुपीनाला) , अटूगडेवाडी (मेणी) , शिरशी ( कासारकी) करमाळा नं १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं १ पाडळीवाडी यामध्ये (५०%) भाटशिरगाव या मध्ये (५५%) खिरवडे , बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६०%) बादेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक)या मध्ये ( ७०%) , भैरववाडी ,तडवळे नं१ या मध्ये (२०%) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर इंधन विहिरी ५३० असून यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितले प्रमाणे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे , वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस देवकर , लालासाहेब मोरे , एस डी देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.१ मार्च पासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.

-एस.डी देसाई,शाखा अभियंता , शिराळामोरणा प्रकल्प

 

  • करमजाई तलाव ९९ % ,
  • अंत्री बुद्रुक तलाव १३%
  • शिवणी तलाव १५%
  • टाकवे तलाव २४%
  • रेठरे धरण तलाव १%
  • कार्वे तलाव २०%
  • मोरणा मध्यम प्रकल्प २५% 
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीshirala-acशिराळा