शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धनाथ तलावातील पाणी रब्बी पिकांना

By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST

पिकांना जीवदान : तीन वर्षांनंतर कालव्यातून पाणी; शेतकऱ्यांत समाधान--लोकमतचा प्रभाव

दरीबडची : सिद्धनाथ (ता. जत) येथील लघु पाटबंधारे तलावातील पाणी कालव्यातून तीन वर्षांनंतर प्रथमच रब्बी हंगामातील पिकासाठी सोडण्यात येणार आहे. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. पाणी कालव्यात सोडण्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीनही गावातील १२७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. पाण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.पूर्व भागातील सिद्धनाथ येथील लघुपाटबंधारे तलाव १९७२ मध्ये बांधण्यात आला. तलावाची साठवण क्षमता १०२.७३ द.ल.घ.फू. इतकी आहे. तलावापासून ८ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला आहे. तलावापासून ३ कि.मी. कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. यावर्षी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तीन वर्षानंतर प्रथमच तलाव सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरला आहे.कालव्याच्या पाण्याने दरीबडची येथील ३८६ हेक्टर, सिद्धनाथ येथील ५५० हेक्टर, जालिहाळ खुर्द येथील ३४२ हेक्टर क्षेत्र तलावामुळे ओलिताखाली येते. पाणी व्यवस्थापन विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी वेळेवर झाली आहे. पुरेशी ओल, अनुकूल हवामान यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. ज्वारी, मका, गहू ही पिके जोमात आली आहेत. सध्या विजेचा पुरवठा अनियमित आहे. तसेच विहीर, कूपनलिकेतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज आहे. तलावातील पाणी सोडल्यास पिकांना फायदा होणार आहे.याबाबत ‘सिद्धनाथ तलावाचे पाणी कालव्यात सोडा’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांची ही मागणी व ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. सिद्धनाथ, दरीबडची गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत. पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून पाणी सोडले जाणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)फळबागांना फायदादरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीन गावांमध्ये द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे. कालव्यातील पाण्याचा फायदा बागांना होणार आहे. सध्या डाळिंब बागा बहरत आहेत, तर द्राक्षबागा लिंबोळीच्या आकारातील आहेत. कालव्यातील पाण्याने विहीर, कूपनलिकांना पाणी वाढणार आहे. भूमिगत पाण्याची पातळी वाढणार आहे.