शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:54 IST

शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती.

ठळक मुद्देदोन हजार विद्यार्थ्यांना प्रबोधन; स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे कार्यक्रमबाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक

सांगली : शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती. मांसाहार केल्याने वर्तमान व भविष्यातील जीवनही खराब होते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक आहे. शाकाहार हाच आदर्श आहार आहे, असे प्रतिपादन मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी केले.

येथील नेमिनाथनगरमध्ये दिगंबर जैनाचार्य, संत शिरोमणी १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य अभिष्ण ज्ञानोपयोगी मुनिश्री नियमसागरजी, प्रबोधसागरजी, वृषभसागरजी, अभिनंदनसागरजी व सुपार्श्वसागरजी यांचा यावर्षीचा संयम-स्वर्ण पावन वर्षायोग सानंद सुरू असून, स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे शनिवारी सांगलीतील विविध शाळांतील जवळजवळ २ हजार विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार अभियानांतर्गत ‘शाकाहार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

नियमसागरजी महाराज म्हणाले, काहीजण मांसाहार करीत नाहीत, परंतु ते मिश्रआहार करीत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे घटक असतात, हे त्यांना माहीत नसते. यामध्ये बेकरीचे पदार्थ केक, बर्गर, पिझ्झा यामध्ये चरबीयुक्त डालडा यासारखे मांसाहारी घटक असतात. त्यामुळे मिश्रआहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ९ वेळा नमस्कार केल्यानंतर अन्न ग्रहण करावे, असा उपदेशही त्यांनी दिला. यावेळी राजकुमार चौगुले, सुहास पाटील, उदय पाटील, प्रशांत पाटील, शीतल पाटील, शीतल वळवडे, सुरेश चौगुुले, प्रवीण वाडकर, राजेंद्र अंकलखोपे, सागर पाटील, भूषण मगदूम, संदीप पाटील, सचिन आळतेकर, किरण इंगळे, राहुल पाटील, वसंत पाटील, मोहन चौगुले, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.दोन हजारावर विद्यार्थ्यांचा सहभागयाप्रसंगी सुपार्श्वसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, अहिंसेचे मूळ स्रोत शाकाहार हेच आहे, असे स्पष्ट करताना, जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे, असे मत व्यक्त केले.बालसंस्कार अभियानाचे संयोजन श्रीमती कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले यांनी केले. यावेळी श्रीमती राजमती गर्ल्स हायस्कूल, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सावरकर, क. भ. दामाणी हायस्कूल, अभिनव बालमंदिरमधील २ हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या