शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:54 IST

शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती.

ठळक मुद्देदोन हजार विद्यार्थ्यांना प्रबोधन; स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे कार्यक्रमबाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक

सांगली : शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती. मांसाहार केल्याने वर्तमान व भविष्यातील जीवनही खराब होते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक आहे. शाकाहार हाच आदर्श आहार आहे, असे प्रतिपादन मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी केले.

येथील नेमिनाथनगरमध्ये दिगंबर जैनाचार्य, संत शिरोमणी १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य अभिष्ण ज्ञानोपयोगी मुनिश्री नियमसागरजी, प्रबोधसागरजी, वृषभसागरजी, अभिनंदनसागरजी व सुपार्श्वसागरजी यांचा यावर्षीचा संयम-स्वर्ण पावन वर्षायोग सानंद सुरू असून, स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे शनिवारी सांगलीतील विविध शाळांतील जवळजवळ २ हजार विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार अभियानांतर्गत ‘शाकाहार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

नियमसागरजी महाराज म्हणाले, काहीजण मांसाहार करीत नाहीत, परंतु ते मिश्रआहार करीत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे घटक असतात, हे त्यांना माहीत नसते. यामध्ये बेकरीचे पदार्थ केक, बर्गर, पिझ्झा यामध्ये चरबीयुक्त डालडा यासारखे मांसाहारी घटक असतात. त्यामुळे मिश्रआहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ९ वेळा नमस्कार केल्यानंतर अन्न ग्रहण करावे, असा उपदेशही त्यांनी दिला. यावेळी राजकुमार चौगुले, सुहास पाटील, उदय पाटील, प्रशांत पाटील, शीतल पाटील, शीतल वळवडे, सुरेश चौगुुले, प्रवीण वाडकर, राजेंद्र अंकलखोपे, सागर पाटील, भूषण मगदूम, संदीप पाटील, सचिन आळतेकर, किरण इंगळे, राहुल पाटील, वसंत पाटील, मोहन चौगुले, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.दोन हजारावर विद्यार्थ्यांचा सहभागयाप्रसंगी सुपार्श्वसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, अहिंसेचे मूळ स्रोत शाकाहार हेच आहे, असे स्पष्ट करताना, जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे, असे मत व्यक्त केले.बालसंस्कार अभियानाचे संयोजन श्रीमती कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले यांनी केले. यावेळी श्रीमती राजमती गर्ल्स हायस्कूल, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सावरकर, क. भ. दामाणी हायस्कूल, अभिनव बालमंदिरमधील २ हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या