शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:54 IST

शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती.

ठळक मुद्देदोन हजार विद्यार्थ्यांना प्रबोधन; स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे कार्यक्रमबाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक

सांगली : शाकाहार ही भारत देशाची संस्कृती असून, ‘शाकाहार’ ही भारताची देन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कृती ही मांसाहारी पद्धतीची होती. मांसाहार केल्याने वर्तमान व भविष्यातील जीवनही खराब होते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हे घातक आहे. शाकाहार हाच आदर्श आहार आहे, असे प्रतिपादन मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी केले.

येथील नेमिनाथनगरमध्ये दिगंबर जैनाचार्य, संत शिरोमणी १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य अभिष्ण ज्ञानोपयोगी मुनिश्री नियमसागरजी, प्रबोधसागरजी, वृषभसागरजी, अभिनंदनसागरजी व सुपार्श्वसागरजी यांचा यावर्षीचा संयम-स्वर्ण पावन वर्षायोग सानंद सुरू असून, स्वर्ण पावन वर्षायोग कमिटीतर्फे शनिवारी सांगलीतील विविध शाळांतील जवळजवळ २ हजार विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार अभियानांतर्गत ‘शाकाहार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर मुनिश्री नियमसागरजी महाराज यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

नियमसागरजी महाराज म्हणाले, काहीजण मांसाहार करीत नाहीत, परंतु ते मिश्रआहार करीत असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे घटक असतात, हे त्यांना माहीत नसते. यामध्ये बेकरीचे पदार्थ केक, बर्गर, पिझ्झा यामध्ये चरबीयुक्त डालडा यासारखे मांसाहारी घटक असतात. त्यामुळे मिश्रआहार करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ९ वेळा नमस्कार केल्यानंतर अन्न ग्रहण करावे, असा उपदेशही त्यांनी दिला. यावेळी राजकुमार चौगुले, सुहास पाटील, उदय पाटील, प्रशांत पाटील, शीतल पाटील, शीतल वळवडे, सुरेश चौगुुले, प्रवीण वाडकर, राजेंद्र अंकलखोपे, सागर पाटील, भूषण मगदूम, संदीप पाटील, सचिन आळतेकर, किरण इंगळे, राहुल पाटील, वसंत पाटील, मोहन चौगुले, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.दोन हजारावर विद्यार्थ्यांचा सहभागयाप्रसंगी सुपार्श्वसागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, अहिंसेचे मूळ स्रोत शाकाहार हेच आहे, असे स्पष्ट करताना, जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे, असे मत व्यक्त केले.बालसंस्कार अभियानाचे संयोजन श्रीमती कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले यांनी केले. यावेळी श्रीमती राजमती गर्ल्स हायस्कूल, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सावरकर, क. भ. दामाणी हायस्कूल, अभिनव बालमंदिरमधील २ हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीvegetableभाज्या