शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत प्लास्टिकच्या बॅगचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

सांगली : राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना, शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरीबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे ...

सांगली : राज्यात प्लास्टिकच्या वापरास बंदी असताना, शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरीबॅग सर्रास वापरल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर पुन्हा सुरू झाला आहे.

------------

वाहनधारक त्रस्त, तर प्रवाशांच्या खिशाला झळ

सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करण्यासाठी बसची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख कायम राहत असल्याने, इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त झाल्याने यांचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. सध्या पेट्रोलने शंभरी पार केल्याने वाहनधारकांबरोबर प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

----------

ग्रामीण भागात कोरोनाचा विसर

सांगली : ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह असणारे आणि त्यांचे कुटुंबीय बिनधास्त बाहेर फिरत आहेत. यामुळे कोविडचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करून नये म्हणून स्थानिक प्रशासनाने निर्बंध लादण्याची व अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

-----------

सांगलीत बँकासमोर पार्किंगची समस्या

सांगली : शहरात काही राष्ट्रीयीकृत बँका बाजारपेठ भागात असल्याने तेथे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. बँकेत येणारे ग्राहक दुकानांसमोर वाहने लावतात. मात्र त्यावरून काहीवेळा वादही निर्माण होतात. त्यामुळे बँक प्रशासनाने पार्किंगची सोय करण्याची गरज आहे.

-----------

जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची गरज

सांगली : ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत, त्यांचे पावसाळ्यात खते वाहतुकीसाठी मोठे हाल होतात. त्यामुळे संबंधित विभागाने सर्व्हे करून व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणंद रस्ते तयार करण्याची गरज आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत.

-------------

उपबाजारांची अवस्था वाईट

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या चार उपबाजारांपैकी तीन उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बाजार समिती पदाधिकारी आणि प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.

--------------

बालविवाहांवर प्रशासनाची नजर

सांगली : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण, प्रशासनाचे नजर चुकवून अनेक बालविवाह होत आहेत. याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांची मागणी आहे.