शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Sangli: काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत कुरकुर करू नये, अन्यथा...; चंद्रहार पाटील यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:40 IST

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.

विटा : आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील आठपैकी दोन मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने कुरकूर करू नये. त्यांनी गद्दारीचा विचार सोडून द्यावा, अन्यथा, त्यांना महाराष्ट्रभर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उद्धवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी रविवारी दिला.विटा येथे ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघासह अन्य एक किंवा दोन ठिकाणी राष्ट्रवादी लढेल, असे जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनीही जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार असतील, असे म्हटले आहे. त्यांची खिल्ली चंद्रहार पाटील यांनी उडविली.ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात १२-१५ आमदार करायचे असतील तर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सध्या फक्त आठ मतदारसंघ आहेत आणि तेथे दोन-दोन उमेदवार विजयी करता येणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिशोबात बोलावे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील चर्चेतून सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला होता. मी उमेदवारी केली होती. महाविकास आघाडी म्हणून नेत्यांनी धर्मपालन करणे गरजेचे होते. तेथे गद्दारी केली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.मात्र आता विधानसभेसाठी ज्याने-त्याने उठून आकडे मांडू नयेत. राज्यात २०१९ ला काँग्रेसचा एक खासदार होता. आता १३ खासदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. आता आठ झाले आहेत. यामागे उद्धव ठाकरे यांचे श्रमदेखील महत्त्वाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती करायची असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी भानावर येऊन संयम ठेवून बोलावे.शिवसेना ठाकरे गट खानापूर आणि मिरज मतदारसंघातून लढणार आहे. दोन्ही ठिकाणी पक्षाची उत्तम बांधणी आहे. २०१४ आणि २०१९ला खानापूर शिवसेनेने जिंकले आहे. मिरज हा शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांची ताकद आणि प्रभाव आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांवर दावा सांगून कुणी गडबड करू नये, अन्यथा राज्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा चंद्रहार पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाchandrahar patilचंद्रहार पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस