शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

ऋषिकेश, हरिद्वारची यात्रा ८ हजारांची, पण फसव्या एजंटांमुळे यात्रेचा खर्च ३० हजारांवर!

By अविनाश कोळी | Updated: June 16, 2024 15:56 IST

बोगस एजंटांवर कारवाई करण्याची नागरिक जागृती मंचची मागणी

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: घरबसल्या बुकिंग करून ऋषिकेश व हरिद्वारची यात्रा अवघ्या आठ हजार रुपयांमध्ये करता येत असताना फसव्या एजंटांमुळे प्रवाशांकडून ३० हजार रुपये पॅकेजच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत. नुकतीच अशी फसवेगिरीची घटना उजेडात आल्याने संबंधित एजंटवर कारवाई करण्याची मागणी नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आली आहे.

यात्रेकरूंची फसवणूक होऊ नये म्हणून मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे प्रवाशांनी स्वत: यात्रेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मिरज जंक्शनजवळील बोगस रेल्वे एजंटांवर सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

तिकीट १ हजारात, राहण्याची सोय मोफत

सांगली ते ऋषिकेश, हरिद्वारचे रेल्वे तिकीट फक्त १ हजार रुपये आहे. येता-जाता प्रति व्यक्ती दोन हजार रुपये खर्च होतो. ऋषिकेश येथे भाविकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे. त्याची माहितीही मंचने दिली होती. रेल्वे तिकिटाचे दोन हजार व इतर खर्च ५ ते ६ हजार गृहित धरला तर ८ हजार खर्चून एक व्यक्ती सांगली ते ऋषिकेश, हरिद्वार जाऊन सहा ते सात दिवसांत परत येऊ शकतो.

ट्रॅव्हल कंपनीसोबत एजंटांचे संगनमत

मिरजेतील काही बोगस रेल्वे एजंटांनी इचलकरंजीच्या ट्रॅव्हल कंपनीसोबत संगनमत करून सांगली स्थानकाऐवजी मिरजेतून पॅकेज टूरमार्फत जाण्यास प्रेरित करून अनेक प्रवाशांकडून हरिद्वारसाठी प्रति व्यक्ती २५ ते ३० हजार रुपये घेऊन फसवले आहे, अशी तक्रार मंचने केली आहे.

रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट काढून देतो म्हणून प्रवाशांची फसवणूक करणारे इतर अनेक बोगस रेल्वे एजंट मिरज स्थानकावर कार्यरत असून, अशा सर्वांवर गुन्हा दाखल करावा. तसेच चारधामच्या यात्रेचे पॅकेज घेऊन हरिद्वारात प्रवाशांना सोडून येणाऱ्या व पॅकेज करून लुटणाऱ्या एजंटांवरही कारवाई करावी, अशी मागणी मंचने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली