शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोरोनाच्या दुष्काळात परीक्षा रद्दचा तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

रात्रं-दिवस पुस्तकात खुपसलेले डोके अखेर वर येते अन् दहावीच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नव्याची नवलाई...मनात उत्साहाचे बोट धरून आलेली ...

रात्रं-दिवस पुस्तकात खुपसलेले डोके अखेर वर येते अन् दहावीच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नव्याची नवलाई...मनात उत्साहाचे बोट धरून आलेली धाकधूक...मित्र-मैत्रिणींना कित्येक दिवसानंतर भेटण्याचा आनंद...असं सारं वातावरण म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक सुंदर सहलच. एखाद्या पाखरासारखे भुर्रकन परीक्षेचे दिवसही निघून जातात. मनावरील, शरीरावरील ताण पेपर संपेपर्यंत हलका होतो. त्यानंतर, सुट्टीचा मिळणारा आनंद हा अन्य कोणत्याही सुट्ट्यांपेक्षा सुंदर असतो. प्रत्येक दिवसागणिक हा आनंद बहरत जातो. आनंदाच्या वादळात हे दिवसही पाखरासारखे उडून जातात आणि पुन्हा एक उत्सुकतेचा दिवस विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो. तो दिवस म्हणजे निकालाचा.

पूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस म्हणजे तर भन्नाट होता. सकाळी लवकर उठून देवाला नमस्कार करून, नवस बोलून पोरं घराबाहेर पडायची आणि थेट छापखाना किंवा पेपरच्या कार्यालयात जाऊन उभी रहायची. तुडुंब गर्दी निकाल पुस्तिकेच्या प्रतीक्षेत असायची. छापखान्याचा तो कर्मचारी बोर्डाची निकाल पुस्तिका घेऊन येताना एखाद्या बाॅलीवूड नटासारखा भासायचा. त्याला सन्मानाने गर्दीतून वाट द्यायची. तो सज्ज झाला की, मुले, त्यांचे पालक परीक्षा क्रमांक लिहिलेल्या कागदाच्या तुकड्यासह निकालासाठी त्याच्यावर तुटून पडायची. घामाघूम होऊन जेव्हा हातात त्याच कागदी तुकड्यावर निकाल कळायचा, तेव्हा लॉटरी लागल्यासारखा आनंद व्हायचा. किलोभर पेढे आणि काहीतरी गोड-धोड घेऊनच मग घर गाठायचे. गल्ली, कॉलनीत, नातलगांना उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांवर स्वार होत आनंदवार्ता सांगायची. शुभेच्छांच्या वर्षावात ऐन उन्हाळ्यात न्हाऊन जायचे.

हळूहळू काळ बदलला अन् निकाल मोबाइलवर कळू लागले. निकाल संकेतस्थळावर येण्याची, नेटचा स्पीड मिळण्याची आणि त्यानंतरची आनंदाची, सेलिब्रेशनची सर्व प्रक्रिया तशीच राहिली. केलेल्या अभ्यासाप्रमाणे गुणांची बरसात निकालपत्रात झाली की, एखादा गड जिंकल्याची भावना मुलांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण व्हायची. हे सर्व क्षण आजवरच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले आणि हृदयाच्या कुपीत जपले. त्याचा दरवळ आठवणींच्या रूपातून नेहमीच आयुष्याला सुगंधीत करीत असतो.

कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडलेली सध्याची दहावीतील नवी पिढी परीक्षा रद्द झाल्याने या सर्व क्षणांच्या आनंदाला मुकली. पालकांच्या आयुष्यातील मुलांच्या दहावीतील यशाचे गोडवे गाण्याची, त्यांचे मन भरून कौतुक करण्याची संधी हरवली. सारंच कसं बेचव झालं. उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया म्हणजे एक अपघात वाटू लागला. शैक्षणिक आयुष्यातील एक बहर कोरोनामुळे वाया गेला. मार्च, २०१९ ते मार्च, २०२० पर्यंतचे दहावीचे एक वर्ष विस्कळीत झाले. कोरोनाच्या या दुष्काळात एप्रिलचा तेरावा महिना उजाडला आणि परीक्षा रद्दच्या निर्णयातून एका पिढीच्या हातातील आनंदाचे क्षण हिरावून नेणारा ठरला.