शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

कोरोनाच्या दुष्काळात परीक्षा रद्दचा तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

रात्रं-दिवस पुस्तकात खुपसलेले डोके अखेर वर येते अन् दहावीच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नव्याची नवलाई...मनात उत्साहाचे बोट धरून आलेली ...

रात्रं-दिवस पुस्तकात खुपसलेले डोके अखेर वर येते अन् दहावीच्या पहिल्या पेपरचा दिवस उजाडतो. नव्याची नवलाई...मनात उत्साहाचे बोट धरून आलेली धाकधूक...मित्र-मैत्रिणींना कित्येक दिवसानंतर भेटण्याचा आनंद...असं सारं वातावरण म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक सुंदर सहलच. एखाद्या पाखरासारखे भुर्रकन परीक्षेचे दिवसही निघून जातात. मनावरील, शरीरावरील ताण पेपर संपेपर्यंत हलका होतो. त्यानंतर, सुट्टीचा मिळणारा आनंद हा अन्य कोणत्याही सुट्ट्यांपेक्षा सुंदर असतो. प्रत्येक दिवसागणिक हा आनंद बहरत जातो. आनंदाच्या वादळात हे दिवसही पाखरासारखे उडून जातात आणि पुन्हा एक उत्सुकतेचा दिवस विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो. तो दिवस म्हणजे निकालाचा.

पूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस म्हणजे तर भन्नाट होता. सकाळी लवकर उठून देवाला नमस्कार करून, नवस बोलून पोरं घराबाहेर पडायची आणि थेट छापखाना किंवा पेपरच्या कार्यालयात जाऊन उभी रहायची. तुडुंब गर्दी निकाल पुस्तिकेच्या प्रतीक्षेत असायची. छापखान्याचा तो कर्मचारी बोर्डाची निकाल पुस्तिका घेऊन येताना एखाद्या बाॅलीवूड नटासारखा भासायचा. त्याला सन्मानाने गर्दीतून वाट द्यायची. तो सज्ज झाला की, मुले, त्यांचे पालक परीक्षा क्रमांक लिहिलेल्या कागदाच्या तुकड्यासह निकालासाठी त्याच्यावर तुटून पडायची. घामाघूम होऊन जेव्हा हातात त्याच कागदी तुकड्यावर निकाल कळायचा, तेव्हा लॉटरी लागल्यासारखा आनंद व्हायचा. किलोभर पेढे आणि काहीतरी गोड-धोड घेऊनच मग घर गाठायचे. गल्ली, कॉलनीत, नातलगांना उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांवर स्वार होत आनंदवार्ता सांगायची. शुभेच्छांच्या वर्षावात ऐन उन्हाळ्यात न्हाऊन जायचे.

हळूहळू काळ बदलला अन् निकाल मोबाइलवर कळू लागले. निकाल संकेतस्थळावर येण्याची, नेटचा स्पीड मिळण्याची आणि त्यानंतरची आनंदाची, सेलिब्रेशनची सर्व प्रक्रिया तशीच राहिली. केलेल्या अभ्यासाप्रमाणे गुणांची बरसात निकालपत्रात झाली की, एखादा गड जिंकल्याची भावना मुलांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण व्हायची. हे सर्व क्षण आजवरच्या अनेक पिढ्यांनी अनुभवले आणि हृदयाच्या कुपीत जपले. त्याचा दरवळ आठवणींच्या रूपातून नेहमीच आयुष्याला सुगंधीत करीत असतो.

कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडलेली सध्याची दहावीतील नवी पिढी परीक्षा रद्द झाल्याने या सर्व क्षणांच्या आनंदाला मुकली. पालकांच्या आयुष्यातील मुलांच्या दहावीतील यशाचे गोडवे गाण्याची, त्यांचे मन भरून कौतुक करण्याची संधी हरवली. सारंच कसं बेचव झालं. उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया म्हणजे एक अपघात वाटू लागला. शैक्षणिक आयुष्यातील एक बहर कोरोनामुळे वाया गेला. मार्च, २०१९ ते मार्च, २०२० पर्यंतचे दहावीचे एक वर्ष विस्कळीत झाले. कोरोनाच्या या दुष्काळात एप्रिलचा तेरावा महिना उजाडला आणि परीक्षा रद्दच्या निर्णयातून एका पिढीच्या हातातील आनंदाचे क्षण हिरावून नेणारा ठरला.