शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 8:51 PM

यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. 

ठळक मुद्दे एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल.

सांगली - कडकनाथ घोटाळ्याबद्दल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीची भाषा वापरत मंत्री सदाभाऊ खोत यांनी धमकावले आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मंत्रीपद व आमदारकी रद्द करावी तसेच कडकनाथ घोटाळा अनेक राज्यात पसरला असल्याने त्याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. छत्तीसगड मधील शेतकऱ्यांनी त्याबाबत सांगलीमध्ये पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारलेले आहे. याबाबत मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते हे महारयतच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना दमबाजी करत आहेत. त्याबाबतचे विडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनीच गुन्हे दाखल करावेत अशी भूमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आपला संबंध जोडल्यामुळे चिडून जाऊन  मंत्री सदा खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनकर्त्याविरुध्द अतिशय घाणेरडी भाषा वापरली. तुमच्या श्राद्धच जेवण मी जेवणार, सावज टप्यात आल्यावर शिकार करणार, तुमच्या छाताडावर नाचणार अशी असंसदीय भाषा वापरून जाहीररित्या आंदोलनकर्त्यांनी धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या इतिहासात कोणाही मंत्र्याने इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरली नाही. या धमकीची दखल घेऊन पोलिसांनी मंत्री सदा खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आंदोलनकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला मंत्री सदाभाऊ खोत हे जबाबदार असतील. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल. तसेच या प्रकाराची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेऊन सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद व आमदारकी रद्द करावी अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच छत्तीसगड, राजस्थान व इतर राज्यातील शेतकऱ्यांची देखील या प्रकरणात फसवणूक झाली असल्याने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान देऊन त्यांना खाद्य व इतर सोइ पुरवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुभाष पाटील, नामदेव करगणे, प्रा. वासुदेव गुरव, जयंत जाधव, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, अल्ताफ पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत advocateवकिलSangliसांगलीMLAआमदार