शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: October 20, 2015 00:22 IST

संजय पाटील : दक्षता समिती बैठकीत आदेश

सांगली : ग्रामीण भागातील पाणीटंचाई आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना तातडीने पूर्ण करणे आवश्यक असून, केवळ आपल्या लाभासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी सोमवारी दिले. जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या आढाव्यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून रखडली जात असल्याची तक्रार केली. या पाणी योजना रखडल्याने त्या भागातील पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. यावर, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या आढाव्यावेळी जत तालुक्यातील अपूर्ण विहिरींची कामे बंद पडली असल्याची बाब आमदार विलासराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिली असता, अशा विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांची कामे रोहयोतून करण्याची सूचना आमदार अनिल बाबर, विलासराव जगताप यांनी केली. यावर जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरफळ आणि शिराळा तालुक्यातील वारणा कालव्यातील पोटकालवे व यंत्राशिवाय करता येण्यासारखी कामे करावीत, अशी सूचना खासदारांनी दिली. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे बंद पडत असताना, त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न होता शेतीसाठी होत असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आटपाडीला होणारा पाणी पुरवठा अनियमित होत असून २० दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेची थकबाकी भरणे शासनाचे काम नसून ग्रामपंचायतीकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची मागणी बाबर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, कवठेमहांकाळ सभापती वैशाली पाटील, वैशाली माळी, चंद्रकांत पाटील, रवींद्र बर्डे, सुमन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आदेश,निर्णयरोहयोतून अपूर्ण विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करा.सिंचन योजनांची कामे रोहयोतून करा.शौचालयांच्या कामांसाठी खासगी कंपन्यांचे साहाय्य घ्या.दुष्काळात धान्यवाटप सुरळीत होण्याकडे लक्ष द्या.इंदिरा आवास योजनेत लाभार्थींना संधी द्या.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात कारवाई करा. सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून अहवाल सादर करा.