शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: October 20, 2015 00:22 IST

संजय पाटील : दक्षता समिती बैठकीत आदेश

सांगली : ग्रामीण भागातील पाणीटंचाई आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना तातडीने पूर्ण करणे आवश्यक असून, केवळ आपल्या लाभासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी सोमवारी दिले. जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या आढाव्यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून रखडली जात असल्याची तक्रार केली. या पाणी योजना रखडल्याने त्या भागातील पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. यावर, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या आढाव्यावेळी जत तालुक्यातील अपूर्ण विहिरींची कामे बंद पडली असल्याची बाब आमदार विलासराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिली असता, अशा विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांची कामे रोहयोतून करण्याची सूचना आमदार अनिल बाबर, विलासराव जगताप यांनी केली. यावर जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरफळ आणि शिराळा तालुक्यातील वारणा कालव्यातील पोटकालवे व यंत्राशिवाय करता येण्यासारखी कामे करावीत, अशी सूचना खासदारांनी दिली. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे बंद पडत असताना, त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न होता शेतीसाठी होत असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आटपाडीला होणारा पाणी पुरवठा अनियमित होत असून २० दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेची थकबाकी भरणे शासनाचे काम नसून ग्रामपंचायतीकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची मागणी बाबर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, कवठेमहांकाळ सभापती वैशाली पाटील, वैशाली माळी, चंद्रकांत पाटील, रवींद्र बर्डे, सुमन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आदेश,निर्णयरोहयोतून अपूर्ण विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करा.सिंचन योजनांची कामे रोहयोतून करा.शौचालयांच्या कामांसाठी खासगी कंपन्यांचे साहाय्य घ्या.दुष्काळात धान्यवाटप सुरळीत होण्याकडे लक्ष द्या.इंदिरा आवास योजनेत लाभार्थींना संधी द्या.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात कारवाई करा. सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून अहवाल सादर करा.