शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: October 20, 2015 00:22 IST

संजय पाटील : दक्षता समिती बैठकीत आदेश

सांगली : ग्रामीण भागातील पाणीटंचाई आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना तातडीने पूर्ण करणे आवश्यक असून, केवळ आपल्या लाभासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश खासदार संजय पाटील यांनी सोमवारी दिले. जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिल बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांच्या आढाव्यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून रखडली जात असल्याची तक्रार केली. या पाणी योजना रखडल्याने त्या भागातील पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. यावर, केवळ स्वत:च्या फायद्यासाठी योजनांची कामे थांबविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या आढाव्यावेळी जत तालुक्यातील अपूर्ण विहिरींची कामे बंद पडली असल्याची बाब आमदार विलासराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिली असता, अशा विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांची कामे रोहयोतून करण्याची सूचना आमदार अनिल बाबर, विलासराव जगताप यांनी केली. यावर जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू, आरफळ आणि शिराळा तालुक्यातील वारणा कालव्यातील पोटकालवे व यंत्राशिवाय करता येण्यासारखी कामे करावीत, अशी सूचना खासदारांनी दिली. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे बंद पडत असताना, त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न होता शेतीसाठी होत असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आटपाडीला होणारा पाणी पुरवठा अनियमित होत असून २० दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेची थकबाकी भरणे शासनाचे काम नसून ग्रामपंचायतीकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्याची मागणी बाबर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे, कवठेमहांकाळ सभापती वैशाली पाटील, वैशाली माळी, चंद्रकांत पाटील, रवींद्र बर्डे, सुमन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आदेश,निर्णयरोहयोतून अपूर्ण विहिरींची कामे प्राधान्याने पूर्ण करा.सिंचन योजनांची कामे रोहयोतून करा.शौचालयांच्या कामांसाठी खासगी कंपन्यांचे साहाय्य घ्या.दुष्काळात धान्यवाटप सुरळीत होण्याकडे लक्ष द्या.इंदिरा आवास योजनेत लाभार्थींना संधी द्या.१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात कारवाई करा. सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून अहवाल सादर करा.