शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खोकीधारकांवर टांगती तलवार कायम

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तात्पुरता दिलासा

आष्टा : आष्टा बसस्थानकासमोरील खोकीधारकांची अतिक्रमणे काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी नुकतीच स्थगिती दिली आहे, मात्र लवकरच ही अतिक्रमणे काढावी लागणार असल्याने या खोकीधारकांमध्ये ‘थोडी खुशी गम जादा’ अशी भावना आहे.पेठ-सांगली रस्त्यावर आष्ट्यानजीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आष्टा बसस्थानकासमोरील सांगली, आष्टा, इस्लामपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ३५ ते ४0 वर्षापासून अनेक बेरोजगार युवकांनी लोखंडी खोकी टाकून स्वत:चे व्यवसाय सुरु केले. कोणी गॅरेज, सायकल दुकान, आॅटो पार्टस्, वेल्डींग, केशकर्तनालय, तर कोणी पानपट्टी, बेकरी, जनरल स्टोअर्स, रसवंतीगृह, नाष्टा सेंटर, हॉटेल सुरु केले. त्यांनी अनेक बँका, पतसंस्थांची यासाठी कर्जे काढली.सहा महिन्यांपूर्वी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व खोकीधारक यांच्यात बैठक होऊन रस्त्याच्या माध्यमापासून १५ मीटरऐवजी ११ मीटरचा रस्ता, १ मीटर गटार, फुटपाथ सोडून दुकान गाळे खोकी ठेवण्यास मान्यता देण्यात आली. त्याप्रमाणे खोकीधारकांनी खोकी मागे सरकवून घेतली. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले, जिल्हाधिकारी यांना आदेश मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आष्टा शहरातील सार्वजनिक बांधकामच्या जागेतील खोकीधारकांचीही अतिक्रमणे काढण्याचे आदेश मिळाल्याने दि. १८ ते २१ पर्यंतची मुदत देऊन ती खोकी काढण्याची नोटीस सर्व १२७ खोकीधारकांना देण्यात आली. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे, नगराध्यक्षा मंगला शिंदे यांनी बैठक घेतली.या नोटिसीनंतर खोकीधारकांमध्ये खळबळ माजली. लाखो रुपये कर्ज काढून उभारलेली दुकाने जाणार, या भीतीने ते हवालदिल झाले. तीन दिवस दुकाने बंद ठेवून त्यांनी या घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसन करण्याची मागणी करीत निवेदन दिले. माजी आमदार विलासराव शिंदे, मुख्याधिकारी अभिजित राऊत, वाळवा पंचायत समितीचे उपसभापती वैभव शिंदे, विशाल शिंदे, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, सुनील माने, शैलेश सावंत यांच्यासह खोकीधारकांची जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी बैठक झाली. त्यांनी पर्यायी जागांबाबत चर्चा केली. खोकीधारकांना तीन महिन्याची मुदत दिली. आष्टा बसस्थानक परिसरातील एसटी महामंडळाची जागा, तसेच जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागेबाबतही विचार झाला. या जागांबाबत खोकीधारक सकारात्मक असले तरी लवकर निंर्णय होणे आवश्यक आहे. या खोक्यांबरोबर शासनाच्या जागेवरील अन्य अतिक्रमणांवरही हातोडा पडणार असल्याने नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तीन महिन्यांची मुदत असली तरी, तीन महिन्यानंतर काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. (वार्ताहर)