शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले दहा हजार हेक्टरने

By admin | Updated: July 30, 2015 00:27 IST

गाळपाचे आव्हान : शेतकऱ्यांची साखर कारखानदारांकडून अडवणूक होण्याची चिन्हे; उत्पादक चिंतेत--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे - सांगली -जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षी ७४ हजार ४७९ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. यामध्ये २०१५-१६ वर्षाच्या गळीत हंगामासाठी जाणाऱ्या उसाचे क्षेत्र दहा हजार हेक्टरने वाढून ८४ हजार ९६६ हेक्टर झाले आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी टप्प्यातील काही भागात फिरले आहे. या पाण्यावर शेतकऱ्यांनी अन्य पिके घेण्याऐवजी उसाचे पीक घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्राचा विचार केल्यास, येत्या ऊस गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखान्यांकडून वेळेवर ऊस गाळपास जाईल, याची खात्री देता येणार नाही. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच दुष्काळी भागातील शेतकरीही उसाकडेच वळल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दुष्काळी जत, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी फिरले आहे. येथील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करण्याची गरज होती. परंतु, पाणी उपलब्ध झाल्यामुळे तेथील शेतकरीही ऊस पिकाकडेच वळल्याचे दिसत आहे. जत तालुक्यातील उसाचे क्षेत्र ६०० हेक्टरवरून दुप्पट होऊन १२७४ हेक्टर झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील २ हजार ६४९ हेक्टरवरून ३ हजार ८१० हेक्टर उसाचे क्षेत्र झाले आहे. आटपाडी, खानापूर तालुक्यात दुप्पट, तर कडेगाव तालुक्यात अडीच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. शिराळा, तासगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातही एक ते दोन हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांची उसाची चिंता संपली आहे. मात्र, कारखानदारांनी वेळेत गळीत हंगाम सुरु केला तरच हा ऊस संपणार आहे. दराच्या प्रश्नावरून कारखानदारांनी वेळेवर हंगाम सुरु केला नाही, तर शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावणार आहे. कारखानदारांनी वेळेवर ऊस गाळपास नेला नाही, तर फार मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.अन्य पिकांची शेतकऱ्यांना धास्तीउसाला चांगला दर मिळू लागल्यामुळे मागील दोन वर्षापासून शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. आता साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांना १५०० ते २२०० रुपयांपर्यंत दर दिला आहे. उर्वरित पैसे मिळतील, याची खात्री नाही. तरीही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे. अर्थात यामध्ये त्या शेतकऱ्यांचीही काही चूक नाही. कारण, अन्य पिकांना कधी अवकाळीचा फटका, तर कधी दलालांच्या साठेबाजीमुळे दराचा फटका बसतो. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. या सर्व अडचणी आणि समस्या असूनही शेतकरी ऊस पिकाकडेच वळत आहे. जिल्ह्यातील उसाचे तालुकानिहाय क्षेत्र तालुका २०१४-१५ २०१५-१६मिरज१४१७६१३९०६वाळवा२९००९२९९०६शिराळा४५३२६१०७तासगाव४२६९६४१०पलूस८९८५९२७४तालुका २०१४-१५ २०१५-१६कडेगाव८३००१०१२०खानापूर११०१३२८०आटपाडी८७६११८०क़महांकाळ२६४९३८१०जत६००१२७४