शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीप्रकरणी फौजदारी दाखल करा

By admin | Updated: July 5, 2014 23:56 IST

सदस्यांची मागणी : मिरज पं. स. सभेत सदस्य आक्रमक

मिरज : वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली. रोजगार हमी योजनेच्या कामातील ग्रामसेवक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभापती सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती माणिकताई चौधरी, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. वड्डी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न सदस्या राणी देवकारे यांनी विचारला. यावेळी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिष्यवृत्तीच्या रकमेत अपहार झाला यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज असताना कागदीघोडे नाचविण्यात येत आहेत. दोशी मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश निळकंठ, शंकर पाटील यांनी केली, तर त्या मुख्याध्यापक व शिक्षकाची तालुक्याबाहेर बदली करा, अशी मागणी आबासाहेब चव्हाण यांनी केली. शुभांगी पाटील व सारिका खताळ यांनी गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे प्रश्न उपस्थित केले.
गेल्या तीन वर्षात १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत के लेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी दिलीप बुरसे यांनी केली. पंचवीस पंधरा योजनेच्या १ कोटीचा विशेष निधी आधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत गेल्याचा आरोप सतीश निळकंठ यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला. १ कोटीचा निधी पंचायत समितीच्या बांधकाम विभागास मिळाल्याचे अभियंता पी. के. प्रदीप यांनी सांगितले.
बुधगावातील अनिल दुधाप्पा होवाळे, सुदाम रघुनाथ बंडगर व मधुकर रामचंद्र पाटील या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील विहिरी मंजूर आहेत. या शेतकऱ्यांना विहिरींचे निम्मे अधिक अनुदान मिळाले त्यानंतर तीन ग्रामसेवकांनी हजेरी पुस्तक न भरल्याने हे शेतकरी उर्वरीत अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार सतीश निळकंठ यांनी केली.
शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्जाचा बोजा करुन विहिरी पूर्ण केल्या आहेत. उर्वरीत अनुदान न मिळाल्यास त्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांमुळेच रोजगार हमी योजनेची कामे रखडल्याचा आरोप बाबासाहेब कांबळे यांनी केला. बुधगावच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या अनुदानाबाबत चौकशी करुन न्याय देण्याचे ओदश गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी दिले.
या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, छोटे पाटबंधारे, आरोग्य व ग्रामपंचायत आदींसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)