शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांच्या शोधासाठी सात पथके

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

राजापूर हल्ला प्रकरण : तासगावात आज ग्रामस्थांचे धरणे

कवठेएकंद : राजापूर (ता. तासगाव) येथील येरळा नदीच्या पात्रात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या येरळा बचाव कृती समितीच्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या शोधार्थ पोलिसांची सात पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नाही.
दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात राजापूर ग्रामस्थांच्यावतीने काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोक्का कायदा लावून कारवाई करावी, या मागणीसाठी राजापूर येथे गावबंद करून आंदोलन करण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री येरळा नदीत वाळू माफियांनी येरळा बचाव समितीच्या शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामध्ये वाळू माफियांनी लोखंडी गज, काठ्या, खोऱ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये सहा शेतकरी जखमी झाले.
संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पवार हे शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दिनकर पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब पाटील (सर्व रा. शिरगाव, ता. तासगाव) यांच्यासह ३० अज्ञातांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भ्याड हल्ल्याचा राजापूर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११ वा. तासगाव शहरातील शिवाजी पुतळा चौकात काळ््या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राजापूर गावबंद करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
संबंधित वाळू माफियांवर मोक्का लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान, या प्रकरणी वाळू माफियांचा शोध घेण्यासाठी तासगाव, पलूस, भिलवडी, कुंडल या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सात पथके रवाना झाली आहेत. सावर्डे, कौलगे, बोरगाव, भिलवडी, पलूस, वायफळे, सावळज यासह जिल्ह्यातील इतर गावात त्यांचा शोध चालू आहे. माफियांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही टाकले. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)


मोक्काची मागणी
राजापूर येथील येरळा नदीत वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. याबाबत ग्रामस्थांनी महसूल व पोलीस यंत्रणेकडे तक्रारीही केल्या. पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच वाळू चोरी रोखण्याचा निर्धार केला. पण काल वाळू माफियांनी ग्रामस्थांवरच हल्ला केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.