शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे, हजार लोकांमागे केवळ एकच पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच ...

सांगली : गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात सध्या पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. हजार लोकसंख्येमागे केवळ एकच पोलीस असल्याने जिल्हा सध्या सुरक्षेच्याबाबतीत रामभरोसे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीची गरज आहे.

राज्यातील २०१९ च्या एकूण आयपीसी गुन्ह्यांचा विचार केला, तर सांगली जिल्हा राज्यात १३ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी गुन्ह्यांचा तपास करणे, संचलन, नाकाबंदी व अन्य कामांसाठी पोलिसांचे बळ कमी पडत आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये सांगली जिल्ह्याची आकडेवारी चांगली असली, तरी गुन्हे नियंत्रणात आणताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या तपास शाखा व पोलीस ठाणी असली, तरी त्यामधील संख्याबळ हे सध्या पुरेसे नाही. सध्या रिक्तपदे २०० च्या आसपास आहेत. पहिल्या टप्प्यात १२० पोलिसांची भरती होणे अपेक्षित असून, उर्वरित भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळणार असला, तरी तोही फार पुरेसा ठरेल, अशी स्थिती नाही.

चाैकट

जिल्ह्याची लोकसंख्या २८,२२,१४३

एकूण पोलीस २,६००

चौकट

पोलिसांवर पडतोय अतिरिक्त ताण

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा पोलिसांशी केलेल्या चर्चेनुसार आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांवर अधिक ताण पडतो. त्यावेळी डबल ड्युटी करावी लागते. सुट्या, रजा मिळविण्यासाठी पूर्वीसारखी ओढाताण होत नसली, तरी कोरोना, महापूर व अन्य संकटावेळी पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द होतात. मंत्र्यांचे दौरे व अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळीही पोलिसांना १० ते १२ तास काम करावे लागते.

चौकट

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार निम्मेच पोलीस

संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या प्रमाणानुसार लाखामागे २२२ पोलिसांची आवश्यकता असते. भारत या प्रमाणाच्याबाबतीत जगातील ७१ देशात शेवटून पाचवा आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमाणानुसार याठिकाणी ६ हजार २०० च्या आसपास पोलिसांची गरज आहे. सध्याची संख्या ही निम्म्याहून कमी आहे.

कोट

पोलिसांच्या सध्या दोनशे जागा रिक्त आहेत. जादा बळ मिळाले, तर आणखी चांगले काम करता येऊ शकते. सध्या असलेला ताणही कमी होईल. त्यामुळे नव्या भरतीनंतर निश्चितपणे चांगला फरक दिसून येईल.

- दीक्षित गेडाम, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली