शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सांगलीत आयाराम-गयाराम फॉर्म्युला हिट - सांगली महापालिका रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:57 IST

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे समीकरणे बदलणार : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलासाठी चढाओढ, सर्वपक्षीयांची डोकेदुखी वाढणार

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे. विविध पक्षनेत्यांची गाठभेट घेऊन गुपचूप तिकिटावर दावा केला जात आहे. गेल्या दोन ते तीन निवडणुका पाहता, आयाराम-गयाराम फॉर्म्युला चांगलाच हिट ठरला आहे. यंदाही अनेक नगरसेवक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहेत.

महापालिकेच्या निवडणुका जून-जुलै महिन्यात होत आहेत. त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नव्याने चारसदस्यीय प्रभाग रचनेत मोठे प्रभाग झाल्याने संभाव्य उमेदवारांची दमछाक होणार आहे. १५ ते २० हजार मतदारसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना धडपड करावी लागेल. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर दलबदलूंच्या चर्चेला उधाण आले आहे. तसे पाहता यापूर्वीच्या निवडणुकीतही पक्षनिष्ठा खुंटीला गुंडाळून इतर पक्षात जाणाºयांची संख्या काही कमी नव्हती. यंदाही तोच प्रकार लवकरच पाहण्यास मिळणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. तेव्हा जनता दल हा पालिकेत विरोधी पक्ष होता. राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेसमधील मदन पाटील गट राष्ट्रवादीत गेला. या गटाने जनता दलाशी युती केली. २००३ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत सरळ लढत झाली. कोणालाच बहुमत न मिळाल्याने मिरज संघर्ष समितीचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर मदन पाटील आमदार झाले आणि ते काँग्रेसमध्ये आले. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसमधील सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान, संजय बजाज असा मोठा गट जयंत पाटील यांच्याकडे गेला, तर २०१३ च्या निवडणुकीत सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी हा गट पुन्हा काँग्रेसवासी झाला आणि पालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती आली. त्यामुळे आयाराम-गयाराम संस्कृती तशी सांगलीकरांना नवी राहिलेली नाही.

यंदाच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. प्रभाग रचना जाहीर होताच काही पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी दुसºया पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्यात सर्वाधिक मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. नव्या प्रभाग रचनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे वॉर्डच संपुष्टात आले आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रभागात राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसमोर काँग्रेस अथवा भाजप हेच पर्याय राहिले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर उमेदवारीचा प्रश्नही आहेच. त्यामुळे अनेकांनी भाजप नेत्यांशी संधान साधण्यास सुरूवात केली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षात दलबदलूंची चर्चा जोरात सुरू आहे. निष्ठावंतांकडून अशा दलबदलूंना विरोध होत असला तरी, वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत घातली जात आहे.जसजशा निवडणुका जवळ येतील, तसे सर्वच राजकीय पक्ष नीतीमत्ता बाजूला ठेवून आयाराम-गयारामच्या स्वागतासाठी सज्ज होतील. कोणत्याही परिस्थितीत केवळ सत्ता मिळविणे हाच उद्देश त्यांच्यासमोर असल्याने आतापर्यंत पक्षासाठी राबणाºया कार्यकर्त्यांना काही तरी आमिष दाखवून शांतही केले जाईल.मिरज पॅटर्नवर : राजकीय गणितेमहापालिकेच्या राजकीय पटलावर ‘मिरज पॅटर्न’चा दणका आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अनुभवला आहे. मिरजेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पालिकेत सत्तेवर येतो, हा इतिहास पाहता, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी मिरजेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मिरजेतील जागाही कमी झाल्या आहेत. मिरजेत नेमके कोण कोणत्या पक्षात आहे, हे खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी दुसºयाच पक्षात, तर रात्र होईपर्यंत तो तिसºया पक्षाच्या नेत्यासोबत दिसून येतो. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान हे संघर्ष समितीतून मैदानात उतरतील, असेही बोलले जाते. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेथील संभाव्य उमेदवारांचा पक्ष कोणता, हे सांगणे कठीण आहे.मिरज पॅटर्नवर : राजकीय गणितेमहापालिकेच्या राजकीय पटलावर ‘मिरज पॅटर्न’चा दणका आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अनुभवला आहे. मिरजेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पालिकेत सत्तेवर येतो, हा इतिहास पाहता, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी मिरजेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मिरजेतील जागाही कमी झाल्या आहेत. मिरजेत नेमके कोण कोणत्या पक्षात आहे, हे खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी दुसºयाच पक्षात, तर रात्र होईपर्यंत तो तिसºया पक्षाच्या नेत्यासोबत दिसून येतो. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान हे संघर्ष समितीतून मैदानात उतरतील, असेही बोलले जाते. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेथील संभाव्य उमेदवारांचा पक्ष कोणता, हे सांगणे कठीण आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक