शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

सांगलीत आयाराम-गयाराम फॉर्म्युला हिट - सांगली महापालिका रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:57 IST

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे समीकरणे बदलणार : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलासाठी चढाओढ, सर्वपक्षीयांची डोकेदुखी वाढणार

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेते, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा बदलण्यास सुरूवात केली आहे. विविध पक्षनेत्यांची गाठभेट घेऊन गुपचूप तिकिटावर दावा केला जात आहे. गेल्या दोन ते तीन निवडणुका पाहता, आयाराम-गयाराम फॉर्म्युला चांगलाच हिट ठरला आहे. यंदाही अनेक नगरसेवक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याच्या तयारीत आहेत.

महापालिकेच्या निवडणुका जून-जुलै महिन्यात होत आहेत. त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नव्याने चारसदस्यीय प्रभाग रचनेत मोठे प्रभाग झाल्याने संभाव्य उमेदवारांची दमछाक होणार आहे. १५ ते २० हजार मतदारसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना धडपड करावी लागेल. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर दलबदलूंच्या चर्चेला उधाण आले आहे. तसे पाहता यापूर्वीच्या निवडणुकीतही पक्षनिष्ठा खुंटीला गुंडाळून इतर पक्षात जाणाºयांची संख्या काही कमी नव्हती. यंदाही तोच प्रकार लवकरच पाहण्यास मिळणार आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. तेव्हा जनता दल हा पालिकेत विरोधी पक्ष होता. राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि काँग्रेसमधील मदन पाटील गट राष्ट्रवादीत गेला. या गटाने जनता दलाशी युती केली. २००३ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत सरळ लढत झाली. कोणालाच बहुमत न मिळाल्याने मिरज संघर्ष समितीचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर मदन पाटील आमदार झाले आणि ते काँग्रेसमध्ये आले. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसमधील सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान, संजय बजाज असा मोठा गट जयंत पाटील यांच्याकडे गेला, तर २०१३ च्या निवडणुकीत सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी हा गट पुन्हा काँग्रेसवासी झाला आणि पालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती आली. त्यामुळे आयाराम-गयाराम संस्कृती तशी सांगलीकरांना नवी राहिलेली नाही.

यंदाच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. प्रभाग रचना जाहीर होताच काही पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी दुसºया पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्यात सर्वाधिक मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. नव्या प्रभाग रचनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे वॉर्डच संपुष्टात आले आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रभागात राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसमोर काँग्रेस अथवा भाजप हेच पर्याय राहिले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर उमेदवारीचा प्रश्नही आहेच. त्यामुळे अनेकांनी भाजप नेत्यांशी संधान साधण्यास सुरूवात केली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षात दलबदलूंची चर्चा जोरात सुरू आहे. निष्ठावंतांकडून अशा दलबदलूंना विरोध होत असला तरी, वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत घातली जात आहे.जसजशा निवडणुका जवळ येतील, तसे सर्वच राजकीय पक्ष नीतीमत्ता बाजूला ठेवून आयाराम-गयारामच्या स्वागतासाठी सज्ज होतील. कोणत्याही परिस्थितीत केवळ सत्ता मिळविणे हाच उद्देश त्यांच्यासमोर असल्याने आतापर्यंत पक्षासाठी राबणाºया कार्यकर्त्यांना काही तरी आमिष दाखवून शांतही केले जाईल.मिरज पॅटर्नवर : राजकीय गणितेमहापालिकेच्या राजकीय पटलावर ‘मिरज पॅटर्न’चा दणका आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अनुभवला आहे. मिरजेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पालिकेत सत्तेवर येतो, हा इतिहास पाहता, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी मिरजेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मिरजेतील जागाही कमी झाल्या आहेत. मिरजेत नेमके कोण कोणत्या पक्षात आहे, हे खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी दुसºयाच पक्षात, तर रात्र होईपर्यंत तो तिसºया पक्षाच्या नेत्यासोबत दिसून येतो. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान हे संघर्ष समितीतून मैदानात उतरतील, असेही बोलले जाते. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेथील संभाव्य उमेदवारांचा पक्ष कोणता, हे सांगणे कठीण आहे.मिरज पॅटर्नवर : राजकीय गणितेमहापालिकेच्या राजकीय पटलावर ‘मिरज पॅटर्न’चा दणका आतापर्यंत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने अनुभवला आहे. मिरजेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष पालिकेत सत्तेवर येतो, हा इतिहास पाहता, यंदा सर्वच राजकीय पक्षांनी मिरजेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मिरजेतील जागाही कमी झाल्या आहेत. मिरजेत नेमके कोण कोणत्या पक्षात आहे, हे खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी दुसºयाच पक्षात, तर रात्र होईपर्यंत तो तिसºया पक्षाच्या नेत्यासोबत दिसून येतो. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान हे संघर्ष समितीतून मैदानात उतरतील, असेही बोलले जाते. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेथील संभाव्य उमेदवारांचा पक्ष कोणता, हे सांगणे कठीण आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक