शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:34 PM

किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देवज्रचौंडेत विवाहितेची तीन मुलीसह विहिरीत आत्महत्यापतीशी वाद : दोन मुलींचे मृतदेह सापडले; दोघींचा शोध सुरु

सांगली : किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

सुनीता सुभाष राठोड (वय ३२), तिच्या मुली आशा (४ वर्षे), उषा (४ वर्षे) व ऐश्वर्या (२ वर्षे, सर्व मूळ रा. लमाणतांडा-विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी आशा व उषा या जुळ्या बहिणी आहेत. राठोड कुटूंब तीन महिन्यापूर्वी वज्रचौंडे येथे रस्त्याच्या कामाचे दगड फोडण्यासाठी आले आहे.

सुनीताच्या दोन बहिणी व भाऊही याच कामासाठी आले आहेत. ते गावातच माळावर झोपडी बांधून राहत होते. रविवारी कामावर सुट्टी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुनीताचे पती सुभाष लालसिंग राठोड (४०) याच्या खिशातील पैशाचे पाकीट गायब होते.

याबाबत त्याने सुनीताकडे विचारणा केली. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुभाष दुपारी बारा वाजता मेहूण्याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे गेला. त्याच्या पाठोपाठ सुनीताही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. घरापासून काही अंतरावर असलेल्या संभाजी वसंत जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.

सुभाष राठोड हा दुपारी चार वाजता घरी आला. सुनीता व मुली घरी नव्हत्या. त्याने परिसरात शोध घेतला. पण त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. सायंकाळी विहिरीचे मालक संभाजी जाधव विहिरीवरील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत चप्पलाचे दोन जोड तरंगताना आढळून आले. त्यांनी राठोड यांच्या वस्तीवर जाऊन विहिरीत चप्पल फेकू नका, असे सांगितले. त्यावेळी सुभाष राठोड यास संशय आला. त्याने विहिरीत जाऊन पाहिल्यानंतर या चप्पला मुलींच्या असल्याचे ओळखले.

सुनीताने मुलीसह आत्महत्या केल्याचा त्याला संशय आला. तासगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत अंधार झाल्याने या चौघींचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी शोध मोहिम सुरु करण्यास पोलीस व स्थानिक ग्रामस्थ गेले. आशा व उषा या जुळ्या बहिणींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोरखंडाच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. सुनीता व ऐश्वर्याचा शोध सुरु आहे.विहिर ५० फूटसंभाजी जाधव यांची विहीर ५० फूट खोत आहे. यामध्ये सध्या केवळ दहा फूट पाणी आहे. विहिरीला पाच ते सात फुटापर्यंत बांधीव काठ आहे. पायऱ्या नसल्याने विहिरीत उतरता येत नाही. त्यामुळे या चौघींचे मृतदेह काढताना खूप अडचणी आल्या.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस