शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सांगली : मिरज तालुक्यात बागायत जमिनींचा प्रश्न जटील, चुकीच्या नोंदीने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:55 IST

मिरज तालुक्यातील नदीकाठच्या जमिनींच्या नोंदी जिरायत म्हणून झाल्याने निर्माण झालेला गोंधळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेने आॅनलाईन सातबाऱ्यांच्या नोंदीत बरेच गोंधळ दिसून येत असल्याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देभूसंपादनावेळी बसणार शेतकऱ्यांना फटकापाणीपट्टीला एक नियम, नुकसानभरपाईला वेगळाजिरायतीच्या सातबाऱ्याला बारमाही पिकेशेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी

सांगली : मिरज तालुक्यातील नदीकाठच्या जमिनींच्या नोंदी जिरायत म्हणून झाल्याने निर्माण झालेला गोंधळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेने आॅनलाईन सातबाऱ्यांच्या नोंदीत बरेच गोंधळ दिसून येत असल्याची तक्रार केली आहे.

पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी कसबे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर व बाळासाहेब यशवंत पाटील या दोन शेतकऱ्यांची अनुक्रमे ३८ गुंठे व १५ गुंठे कृष्णा नदीकाठची शेतजमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. या दोन्ही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली अद्याप मिळाली नाही.

शेतकरी संघटनेने याबाबतचा पाठपुरावा करून पाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले. मात्र पाटबंधारे विभागाने शेतजमिनीचे मूल्यांकन जिरायत नोंदीमुळे ५० टक्के कमी दाखविले.

मूल्यांकनाबाबत तहसीलदारांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुकाच आॅनलाईन सात-बारावर जिरायत झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे हा प्रश्न आता जटील बनला आहे. नोंदीत बदल करण्याचे अधिकार आता नेमके कोणाचे हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मिरज तालुक्यामध्ये अनेक शासकीय कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयव राज्य महामार्गांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कसबे डिग्रजप्रमाणे अन्य बागायती शेतींचेही मुल्यांकन कमी होणार आहे. यात मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न अधिक जटील होण्याची चिन्हे आहेत.

पाणीपट्टीला एक नियम, नुकसानभरपाईला वेगळाज्या जमिनी बागायत असूनही जिरायत म्हणून नोंद झाल्या त्यांना नुकसानभरपाई देताना जिरायतचा नियम लावला जातो आणि पाणीपट्टी बागायती म्हणून केली जाते. शेतसाराही तसाच गोळा केला जातो. त्यामुळे शासकीय दप्तरीही सुरू असलेला गोंधळ समोर आला आहे. त्यामुळेच शेतकरी संघटनेने याबाबत संताप व्यक्त केला आहे.जिरायतीच्या सातबाऱ्याला बारमाही पिकेज्या सातबारा उताऱ्यावर वरच्या बाजुस जिरायत नोंद केली आहे, त्याच उताऱ्यावर खाली बागायती बारमाही पिकांची नोंदही दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे उतारे आॅनलाईनला नोंदले जात असताना अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर हक्कातही भूसंपादनाचा उल्लेख नाही.

 

शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावीतलाठ्यांच्या नोंदी करण्याची पद्धत सदोष आहे. त्यामुळे मिरज तालुक्यातील जमिनींच्या चुकीच्या नोंदी झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. याप्रश्नी शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी. आपल्या जमिनींच्या नोंदीबाबत तपासणी करून घ्यावी. ज्यामुळे भविष्यात कोणतेही आर्थिक नुकसान किंवा अडचणी येता कामा नयेत.- प्रा. शरद पाटील, माजी आमदार, प्रदेशाध्यक्ष जनता दल

 

जाणीवपूर्वक चुकाहा प्रकार शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे आॅनलाईन सातबाऱ्यांच्या एकाच तालुक्यातील सर्वच्या सर्व नोंदी कशा काय चुकू शकतात, याचे आकलन कोणालाही होत नाही. अनेक प्रकारच्या चुका आॅनलाईन सातबारा उताऱ्यांत दिसत आहेत. या दुरुस्त्या तातडीने करून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळावे.- सुनील फराटे, शेतकरी संघटना, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी