शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

सांगली : खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या :  दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:53 PM

सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या :  दीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

सांगली : सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त (महसूल) प्रतापराव जाधव, अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विलास काटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. त्याच्या कारणांचा आढावा कृषी विभागाने घ्यावा. बी-बियाणे, खते यांचा पुरेशा प्रमाणात साठा करून, मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, शेतकरी बांधवांना पेरणीसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी बांधवांना समाधानकारक पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे अद्याप केवळ 25 टक्केच उद्दिष्ट गाठले आहे.

हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचित करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे तसेच कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि अनुषंगिक केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी घेतला. जलयुक्त शिवार योजना 2018-19 आराखडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: आराखडा तपासून खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली