शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

सांगली : तासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:34 PM

तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देतासगावच्या मारामारीस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे का? : तटकरे शासनपुरस्कृत गुंडगिरीचे राज्यभर दर्शन

सांगली : तासगावमध्ये भाजपच्या काही गुंडांनी केलेल्या मारामारीच्या घटनेस मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद होता का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.ते म्हणाले की, शासनपुरस्कृत गुंडगिरीचे दर्शन आता राज्यभर घडू लागले आहे. तासगावमधील प्रकार कसा घडला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच कारवाई का केली नाही, त्यांचा या प्रकाराला आशिर्वाद होता का, असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जत येथील सभेतही आम्हाला खासदार, आमदारांच्या गुंडगिरीबद्दल जनतेमधून रोष दिसून आला. जनता या सर्व गोष्टी बघत आहे. त्यामुळे योग्यवेळी भाजपला त्यांची जागा जनताच दाखवून देईल. सरकारचा हस्तक्षेप सर्वच क्षेत्रात सुरू झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचेही नियम त्यांनी हवे तसे बदलले. कर्नाटकमधील निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर कळाला होता. त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या माध्यमातूनही ते निवडणुका जिंकू पहात आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांमागे चौकशा लावल्या जातात, ही गोष्ट आता नवी राहिली नाही. आमच्या पक्षाच्या मागे सिंचन घोटाळ््याची चौकशी लावली आहे. बऱ्याच गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेनेलाही ते अशाच पद्धतीने धमकावत आहेत.नालायकांमध्ये शिवसेनेचे १२ मंत्रीअंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू केल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका केली. शिवसेनेने विरोधाची औपचारिकता दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांकडे डोळे वठारून पाहिल्यानंतर ते मंत्री मौन बाळगून खाली बसले.

शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण आता सर्वांनाच कळाले आहे. शिवसेना सरकारला नेहमीच नालायक म्हणते, पण याच नालायकांमध्ये यांचे १२ मंत्री आहेत, याचे भान त्यांना दिसत नाही.जातीय दंगलीची चिन्हे!विविध जाती-धर्मांच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. निवडणुका अशा जातीय दंगलींच्या बळावर लढविल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनीच याविषयी सतर्कता बाळगावी, असे मत सुनील तटकरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस