शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकसभा पूर्वरंग: एस. डी. पाटील : वाळव्याचे आमदार ते सांगलीचे खासदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:45 IST

सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, ...

सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, एम.आर.देसाई, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण हे वर्गमित्र होते. १९३९ साली त्यांनी वकिली सुरु केली.१९४५ साली त्यांनी वाळवा तालुका शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्याचं १९४९ मध्ये विभाजन झालं. उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा (सध्याचा सांगली जिल्हा) हे दोन जिल्हे निर्माण झाले. नवीन तयार झालेल्या दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे पहिले अध्यक्ष एस. डी. पाटील हे झाले.मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डच्या खुर्च्या, टेबलपासून ते सर्व कागदपत्रांची वाटणी झाली. जणू दोन भावांमधील ही वाटणी होती. मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णाकृती अश्वारूढ तैलचित्र होतं. एस. डी. पाटील यांनी हे तैलचित्रही मागितलं. बाळासाहेब देसाई यांनी मोठ्या भावाचं मन दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते तैलचित्र एस. डी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं. राजकीय सत्ता ही प्रजेसाठी, जनतेसाठी राबविणाऱ्या लोककल्याणकारी राजाची प्रेरणा सतत रहावी, यासाठी हे तैलचित्र मुद्दाम मागून घेतलं होतं.१९५२ साली वाळवा (इस्लामपूर) मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९६२ साली ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. या कारकिर्दीतही चांगले काम केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागात तलाव, सामुदायिक व बुडक्या विहिरी काढण्याचा कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात पायाभूत विकासाची अनेक कामे केली.लोकल बोर्डाच्या जागेवर जि.प.ची इमारत.. एस. डी. पाटील हे दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांनी लोकल बोर्ड इमारतीसाठी सांगली-मिरज रस्त्यावर जागा खरेदी करून ठेवली होती. त्याच जागेवर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना सध्याच्या जिल्हा परिषदेची प्रशस्त अशी घडीव दगडी इमारत बांधण्याचं काम हाती घेतलं आणि पूर्ण केलं. १९६७ साली लोकसभेला मतदार संघाची पुनर्रचना होऊन ४३-सांगली या नावाने हा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेसने सदाशिव दाजी पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत सदाशिव दाजी पाटील हे २,०४,१८५ मते पडून विजयी झाले. त्यांचे विरोधात बी.डी.पाटील यांना ९५,२९३ मते मिळाली. लोकसभेला पुन्हा काँग्रेस पक्षाला २८३ जागा मिळाल्या व बहुमत प्राप्त होऊन इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सांगली-आपासाहेब बिरनाळे, मिरज-जी.डी.पाटील, तासगाव-बाबासाहेब पाटील, खानापूर-संपतराव माने, वाळवा-राजारामबापू पाटील, शिराळा-वसंतराव आनंदराव नाईक, आटपाडी-कवठेमहांकाळ- बी.एस.कोरे, जत-शिवरुद्र बामणे हे विधानसभेवर निवडून आले. यावेळी महाराष्ट्रातील २७० जागांपैकी काँग्रेसने २०३ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. मुख्यमंत्री पदासाठी श्री वसंतराव नाईक यांची निवड झाली. 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व... लोकलबोर्ड, जिल्हा परिषद, विधिमंडळ, लोकसभा तसेच वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करणारे एस.डी.पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. - ॲड.बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधीज्ञ, विटा. 

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभा