शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

लोकसभा पूर्वरंग: एस. डी. पाटील : वाळव्याचे आमदार ते सांगलीचे खासदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:45 IST

सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, ...

सदाशिव दाजी पाटील यांचे गाव वाळवा तालुक्यातील येलूर, एस.डी.पाटील हे राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे शिकत असताना रत्नाप्पा कुंभार, बी.डी.जत्ती, एम.आर.देसाई, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण हे वर्गमित्र होते. १९३९ साली त्यांनी वकिली सुरु केली.१९४५ साली त्यांनी वाळवा तालुका शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्याचं १९४९ मध्ये विभाजन झालं. उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा (सध्याचा सांगली जिल्हा) हे दोन जिल्हे निर्माण झाले. नवीन तयार झालेल्या दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे पहिले अध्यक्ष एस. डी. पाटील हे झाले.मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डच्या खुर्च्या, टेबलपासून ते सर्व कागदपत्रांची वाटणी झाली. जणू दोन भावांमधील ही वाटणी होती. मूळ सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णाकृती अश्वारूढ तैलचित्र होतं. एस. डी. पाटील यांनी हे तैलचित्रही मागितलं. बाळासाहेब देसाई यांनी मोठ्या भावाचं मन दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते तैलचित्र एस. डी. पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं. राजकीय सत्ता ही प्रजेसाठी, जनतेसाठी राबविणाऱ्या लोककल्याणकारी राजाची प्रेरणा सतत रहावी, यासाठी हे तैलचित्र मुद्दाम मागून घेतलं होतं.१९५२ साली वाळवा (इस्लामपूर) मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९६२ साली ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. या कारकिर्दीतही चांगले काम केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागात तलाव, सामुदायिक व बुडक्या विहिरी काढण्याचा कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात पायाभूत विकासाची अनेक कामे केली.लोकल बोर्डाच्या जागेवर जि.प.ची इमारत.. एस. डी. पाटील हे दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांनी लोकल बोर्ड इमारतीसाठी सांगली-मिरज रस्त्यावर जागा खरेदी करून ठेवली होती. त्याच जागेवर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना सध्याच्या जिल्हा परिषदेची प्रशस्त अशी घडीव दगडी इमारत बांधण्याचं काम हाती घेतलं आणि पूर्ण केलं. १९६७ साली लोकसभेला मतदार संघाची पुनर्रचना होऊन ४३-सांगली या नावाने हा मतदार संघ अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेसने सदाशिव दाजी पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत सदाशिव दाजी पाटील हे २,०४,१८५ मते पडून विजयी झाले. त्यांचे विरोधात बी.डी.पाटील यांना ९५,२९३ मते मिळाली. लोकसभेला पुन्हा काँग्रेस पक्षाला २८३ जागा मिळाल्या व बहुमत प्राप्त होऊन इंदिरा गांधी या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सांगली-आपासाहेब बिरनाळे, मिरज-जी.डी.पाटील, तासगाव-बाबासाहेब पाटील, खानापूर-संपतराव माने, वाळवा-राजारामबापू पाटील, शिराळा-वसंतराव आनंदराव नाईक, आटपाडी-कवठेमहांकाळ- बी.एस.कोरे, जत-शिवरुद्र बामणे हे विधानसभेवर निवडून आले. यावेळी महाराष्ट्रातील २७० जागांपैकी काँग्रेसने २०३ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. मुख्यमंत्री पदासाठी श्री वसंतराव नाईक यांची निवड झाली. 

बहुआयामी व्यक्तिमत्त्व... लोकलबोर्ड, जिल्हा परिषद, विधिमंडळ, लोकसभा तसेच वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करणारे एस.डी.पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. - ॲड.बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधीज्ञ, विटा. 

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभा