शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:31 IST

त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.

सांगली : ईडी (सक्तवसुली संचनालय), आयकर यांच्या दबावामुळे राज ठाकरे महागाईवर, केंद्र सरकारवर काहीही बोलत नाहीत. त्यांनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून दिली जाते, अशी टीका जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, देशातील परिस्थितीवर बोलताना महागाईवर बोलले पाहिजे. पेट्रोलचे दर सव्वाशेपर्यंत गेले, स्टील, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. तरीही राज ठाकरे याविषयी ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. त्यांच्यावर ईडी किंवा आयकर विभागाचा दबाव आहे. भाजपशी त्यांची युती झालेली नाही, काही चर्चासुद्धा झालेली नाही. तरीही ते भाजपला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या बोलत आहेत.त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज ठाकरे बोलले तर लोक त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.राज ठाकरे म्हणजे करमणुकीचे साधन आहेत. लोक दोन ते तीन तास त्यांना ऐकतात मनोरंजन समजून सोडून देतात. त्यांना हिंदुच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त मतांचे राजकारण करु पहात आहेत. लोक त्यांना थारा देणार नाहीत.

राज ठाकरे व ओवेसी यांचा डाव

एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात व हिंदुच्या बाजुंनी राज ठाकरे यांनी बोलायचे आणि त्याला विरोध म्हणून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची बाजू मांडायची असे ठरलेले आहे. धार्मिक मतांच्या ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. लोकांनी तो ओळखला आहे. त्यामुळे यांनी कितीही सभा घेतल्या तरी लोक त्यांची दखल घेणार नाहीत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेJayant Patilजयंत पाटीलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस