शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:31 IST

त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.

सांगली : ईडी (सक्तवसुली संचनालय), आयकर यांच्या दबावामुळे राज ठाकरे महागाईवर, केंद्र सरकारवर काहीही बोलत नाहीत. त्यांनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून दिली जाते, अशी टीका जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, देशातील परिस्थितीवर बोलताना महागाईवर बोलले पाहिजे. पेट्रोलचे दर सव्वाशेपर्यंत गेले, स्टील, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. तरीही राज ठाकरे याविषयी ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. त्यांच्यावर ईडी किंवा आयकर विभागाचा दबाव आहे. भाजपशी त्यांची युती झालेली नाही, काही चर्चासुद्धा झालेली नाही. तरीही ते भाजपला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या बोलत आहेत.त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज ठाकरे बोलले तर लोक त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.राज ठाकरे म्हणजे करमणुकीचे साधन आहेत. लोक दोन ते तीन तास त्यांना ऐकतात मनोरंजन समजून सोडून देतात. त्यांना हिंदुच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त मतांचे राजकारण करु पहात आहेत. लोक त्यांना थारा देणार नाहीत.

राज ठाकरे व ओवेसी यांचा डाव

एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात व हिंदुच्या बाजुंनी राज ठाकरे यांनी बोलायचे आणि त्याला विरोध म्हणून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची बाजू मांडायची असे ठरलेले आहे. धार्मिक मतांच्या ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. लोकांनी तो ओळखला आहे. त्यामुळे यांनी कितीही सभा घेतल्या तरी लोक त्यांची दखल घेणार नाहीत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेJayant Patilजयंत पाटीलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस