शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:31 IST

त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.

सांगली : ईडी (सक्तवसुली संचनालय), आयकर यांच्या दबावामुळे राज ठाकरे महागाईवर, केंद्र सरकारवर काहीही बोलत नाहीत. त्यांनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून दिली जाते, अशी टीका जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, देशातील परिस्थितीवर बोलताना महागाईवर बोलले पाहिजे. पेट्रोलचे दर सव्वाशेपर्यंत गेले, स्टील, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. तरीही राज ठाकरे याविषयी ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. त्यांच्यावर ईडी किंवा आयकर विभागाचा दबाव आहे. भाजपशी त्यांची युती झालेली नाही, काही चर्चासुद्धा झालेली नाही. तरीही ते भाजपला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या बोलत आहेत.त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज ठाकरे बोलले तर लोक त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.राज ठाकरे म्हणजे करमणुकीचे साधन आहेत. लोक दोन ते तीन तास त्यांना ऐकतात मनोरंजन समजून सोडून देतात. त्यांना हिंदुच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त मतांचे राजकारण करु पहात आहेत. लोक त्यांना थारा देणार नाहीत.

राज ठाकरे व ओवेसी यांचा डाव

एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात व हिंदुच्या बाजुंनी राज ठाकरे यांनी बोलायचे आणि त्याला विरोध म्हणून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची बाजू मांडायची असे ठरलेले आहे. धार्मिक मतांच्या ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. लोकांनी तो ओळखला आहे. त्यामुळे यांनी कितीही सभा घेतल्या तरी लोक त्यांची दखल घेणार नाहीत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेJayant Patilजयंत पाटीलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस