शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बावचीत आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये शांतता

By admin | Updated: December 29, 2016 22:30 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : गोटखिंडी पंचायत समिती गणातच हालचालींना वेग

प्रतापसिंह माने ल्ल गोटखिंडीजिल्हा परिषद मतदारसंघ पुनर्रचनेत वाळवा तालुक्यात नव्याने बावची गटाची निर्मिती झाली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा नवीन मतदारसंघ आहे. हा गट प्रथमच आरक्षणात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव, तर पंचायत समितीचा बावची गणही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे, जास्त इच्छुकांची नावे पुढे येत नसल्याचे चित्र आहे.बावची गट व बावची गण येथे आरक्षणामुळे मातब्बरांच्या आशेवर पाणी पडले आहे. बावची व गोटखिंडीतून मतदारांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागेल, याकडे लक्ष लागून राहिले आहे. फक्त गोटखिंडी पंचायत समिती गण खुला आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात इतर सर्व पक्ष, संघटना एकत्रित येऊन लढणार, यावरच समीकरणे अवलंबून आहेत. बावची गटातून १९९८ व २००२ मध्ये राष्ट्रवादीचे नेते वसंतराव रकटे यांनी प्रतिनिधित्व केले होते. रकटे यांना तीन वर्षे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीपद मिळाले होते. कुशल कामकाजामुळे त्यांचा दबदबा राहिला होता. यावेळी या मतदार संघात बावची, गोटखिंडी, पोखर्णी, नागाव, काकाचीवाडी, रोजावाडी, फाळकेवाडी, मर्दवाडी मिरजवाडी व कारंदवाडी या गावांचा समावेश होता. पंचायत समितीसाठी संभाजी कचरे व वैभव शिंदे निवडून आले होते. मतदार संघाची २००७ मध्ये पहिल्यांदा पुनर्रचना झाली. बावची मतदारसंघ रद्द होऊन बावची गाव वाळवा मतदार संघाला जोडले गेले. तेव्हा राष्ट्रवादी व हुतात्मा गटात समझोता झाला आणि प्राचार्या सुषमा नायकवडी यांची बिनविरोध निवड झाली होती. बावची पंचायत समिती गणात बंडखोरी झाली. मात्र हुतात्मा गटाच्या प्रभावती गुरव निवडून आल्या. त्यावेळेस गोटखिंडी गाव कामेरी जि. प. मतदार संघाला जोडले गेले. २००७ ला काँग्रेसमधून राधादेवी निळकंठ या विजयी झाल्या. गोटखिंडी पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून सुरेश पाटील विजयी झाले. नंतर २०१२ च्या वाळवा जि. प. मतदार संघातून हुतात्मा गटाला धक्का देत राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील विजयी झाले. बावची पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे लालासाहेब अनुसे विजयी झाले. गोटखिंडी गणातून राष्ट्रवादीच्या रेखाताई कोळेकर विजयी झाल्या. आता पुन्हा बावची मतदार संघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये बावची व गोटखिंडी गणाचा समावेश झाला. बावची गणात बावची, नागाव, पोखर्णी, भडकंबे, तर गोटखिंडी गणात गोटखिंडी, येडेनिपाणी व मालेवाडी गावांचा समावेश आहे. बावची, गोटखिंडी, येडेनिपाणी ही तीन मोठी गावे असून येथील ग्रामपंचायतींवर वर्चस्व राष्ट्रवादीचे आहे. बावची गटात अनुसूचित महिला आरक्षण असल्याने बावचीच्या विद्यमान सरपंच वंदनाताई शिंदे व दलितमित्र विजय लोंढे यांच्या स्नुषा रिना लोंढे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात तालुक्यात इतर पक्षांची कशी आघाडी होते, कोणाची उमेदवारी असणार, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अजून शांतता दिसून येत आहे. बावची गणात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येथून राष्ट्रवादीकडून संभाजी मस्के, पोखर्णीचे अशोक वायदंडे इच्छुक असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्याविरोधात बावची ग्रामपंचायत सदस्य आशिष काळे इच्छुक आहेत. गोटखिंडी गणात हुतात्मा, काँग्रेसचे गट तुल्यबळ आहेत. गोटखिंडी गण खुला असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची रेलचेल आहे. राष्ट्रवादीतून विद्यमान उपसरपंच विजय पाटील, माजी उपसरपंच धैर्यशील थोरात, येडेनिपाणीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, डॉ. सचिन पाटील, माजी उपसरपंच रायसिंग पाटील इच्छुक आहेत. या गणात हुतात्मा गट प्रबळ असल्याने गोटखिंडी ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप पाटील दावेदार आहेत. काँग्रेसकडून येडेनिपाणीच्या शिवतीर्थ दूध संघाचे कार्यकारी संचालक आनंदराव पाटील, एन.एस.यु.आय.चे प्रदेश सरचिटणीस उदय थोरात, माजी उपसरपंच विजय पाटील इच्छुक आहेत.