शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शिराळ्यातील भातशेती महापुराने उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : वारणेच्या महापुरात शिराळा तालुक्यातील नदीकाठची भातशेती पूर्णतः नष्ट झाली आहे. काही शेतातील पीक वाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : वारणेच्या महापुरात शिराळा तालुक्यातील नदीकाठची भातशेती पूर्णतः नष्ट झाली आहे. काही शेतातील पीक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांना हा जबर फटका असून त्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत.

शिराळा तालुक्यातील महापूर आता जवळपास ओसरला आहे. मात्र, पुरानंतर शेतशिवारातील चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. गेल्या काही महिन्यांत पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली पिके महापुराने नामशेष केली आहेत. शिवारात आता केवळ पिकांचे अवशेष पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वारणा काठावरील शिवारात चांदोलीपासून देववाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात भातशेती होती. वारणाकाठ पिकांनी तरारून आला होता. शेतकऱ्यांनी कोमल, इंद्रायणी, बासमती, रत्ना १, सोनम अशा अनेक जातीची भातपिके घेतली होती. परंतु महापुराच्या पाण्याने शेतात सात ते आठ दिवस मुक्काम केल्याने होत्याचे नव्हते झाले. भाताची पिके तर अक्षरशः कुजून, वाहून गेली आहेत. ऊस पिकाला जबर फटका बसला आहे. पेरणीनंतर पिकांवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. भात व ऊस ही हुकमी पिके उद्ध्वस्त झाल्याने शिवारात विदारक चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना रडू कोसळत आहे.

चौकट

धान्याची कमतरता जाणवणार

वारणा काठची भातशेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना यंदा धान्याची कमतरता निश्चित जाणवणार आहे. तालुक्यातील असंख्य छोटे शेतकरी या शेतीवर वर्षाकाठीचा उदरनिर्वाह करतात. असंख्य शेतकरी व्यापारी तत्त्वावर भातशेती करतात. पुराने सर्व हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.