शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

नागनाथअण्णा, तुमचं स्वप्न कधी साकार होणार? -: पाण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:37 IST

गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

अविनाश बाड ।आटपाडी : गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. तेलंगणा सरकारने तीन वर्षात जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना पूर्ण केली. पण २७ व्या पाणी परिषदेत दुष्काळग्रस्तांनो एकत्र या, असे आवाहन वारंवार केले गेले. त्यामुळे नागनाथअण्णा, दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचे तुमचे स्वप्न कधी साकार होणार, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांना पडला आहे.

या दुष्काळग्रस्त भागात येऊन क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी या थोर स्वातंत्र्यसैनिकाने हाक दिली. ११ जुलै १९९३ रोजी आटपाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली पाणी परिषद घेतली. खूप मोठ्या संख्येने लोक भवानी हायस्कूलच्या पटांगणात जमा झाले. चक्का जाम, मानवी साखळी, शेतसारा बंदी अशी अनेक अभिनव आंदोलने करण्यात आली. तत्कालीन शासनात असलेले आर. आर. पाटील, पतंगराव कदम, रामराजे नाईक-निंबाळकर, गणपतराव देशमुख मंत्रिपदी असताना परिषदेस हजर राहिले.२००० मध्येच लवादाच्या कराराची मुदत संपणार असल्याने, त्याआधी योजना पूर्ण करण्यासाठी रेटा लावला पाहिजे, या भूमिकेने दुष्काळग्रस्तांनी भवानी हायस्कूलचे पटांगण खचाखच भरून जात होते.

तेव्हा मंडपही दिला जात नव्हता आणि नागनाथअण्णा शासकीय विश्रामगृहासमोरील तंबूत मुक्काम ठोकायचे. हे सगळे आठवण्याचे कारण, बुधवारी झालेली पाणी परिषद. आता पहिल्याएवढे उंच व्यासपीठही बांधले जात नाही. केवळ मंडप होता, तरीही मंडपातील जागा रिकामी होती. पूर्वी तावातावाने बोलणारे वक्ते आता वयोमानपरत्वे धीराने-दमाने बोलत होते. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यासाठी एकत्रित आलेल्या काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे.या परिषदेत आ. गणपतराव देशमुख, वैभव नायकवडी आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या भाषणाने जान आणली, पण मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी मांडलेला मुद्दा विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणा राज्याने ५०० टीएमसी पाणी उपसा करणारी सिंचन योजना अवघ्या तीन वर्षात पूर्ण केली. ४५ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे.पुढाऱ्यांनी फिरवली पाठ!क्रांतिवीर नागनाथअण्णांनी पुकारलेल्या लढ्यामुळेच टेंभू योजना साकारली. याआधीच्या अनेक पाणी परिषदांना उपस्थित राहणाºया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवली आहे. तासगावमधून आर. आर. पाटील आमदार होते तेव्हा आणि मंत्री झाले, तरीही परिषदेस येत होते. आता त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, खा. संजयकाका पाटील उपस्थित नव्हते. आ. अनिल बाबर अनेकदा आले होते, पण तेही यावेळी उपस्थित नव्हते. माजी आमदार सदाशिवराव पाटील सलग दोनवेळा आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक