शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथअण्णा, तुमचं स्वप्न कधी साकार होणार? -: पाण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:37 IST

गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

अविनाश बाड ।आटपाडी : गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. तेलंगणा सरकारने तीन वर्षात जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना पूर्ण केली. पण २७ व्या पाणी परिषदेत दुष्काळग्रस्तांनो एकत्र या, असे आवाहन वारंवार केले गेले. त्यामुळे नागनाथअण्णा, दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचे तुमचे स्वप्न कधी साकार होणार, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांना पडला आहे.

या दुष्काळग्रस्त भागात येऊन क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी या थोर स्वातंत्र्यसैनिकाने हाक दिली. ११ जुलै १९९३ रोजी आटपाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली पाणी परिषद घेतली. खूप मोठ्या संख्येने लोक भवानी हायस्कूलच्या पटांगणात जमा झाले. चक्का जाम, मानवी साखळी, शेतसारा बंदी अशी अनेक अभिनव आंदोलने करण्यात आली. तत्कालीन शासनात असलेले आर. आर. पाटील, पतंगराव कदम, रामराजे नाईक-निंबाळकर, गणपतराव देशमुख मंत्रिपदी असताना परिषदेस हजर राहिले.२००० मध्येच लवादाच्या कराराची मुदत संपणार असल्याने, त्याआधी योजना पूर्ण करण्यासाठी रेटा लावला पाहिजे, या भूमिकेने दुष्काळग्रस्तांनी भवानी हायस्कूलचे पटांगण खचाखच भरून जात होते.

तेव्हा मंडपही दिला जात नव्हता आणि नागनाथअण्णा शासकीय विश्रामगृहासमोरील तंबूत मुक्काम ठोकायचे. हे सगळे आठवण्याचे कारण, बुधवारी झालेली पाणी परिषद. आता पहिल्याएवढे उंच व्यासपीठही बांधले जात नाही. केवळ मंडप होता, तरीही मंडपातील जागा रिकामी होती. पूर्वी तावातावाने बोलणारे वक्ते आता वयोमानपरत्वे धीराने-दमाने बोलत होते. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यासाठी एकत्रित आलेल्या काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे.या परिषदेत आ. गणपतराव देशमुख, वैभव नायकवडी आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या भाषणाने जान आणली, पण मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी मांडलेला मुद्दा विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणा राज्याने ५०० टीएमसी पाणी उपसा करणारी सिंचन योजना अवघ्या तीन वर्षात पूर्ण केली. ४५ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे.पुढाऱ्यांनी फिरवली पाठ!क्रांतिवीर नागनाथअण्णांनी पुकारलेल्या लढ्यामुळेच टेंभू योजना साकारली. याआधीच्या अनेक पाणी परिषदांना उपस्थित राहणाºया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवली आहे. तासगावमधून आर. आर. पाटील आमदार होते तेव्हा आणि मंत्री झाले, तरीही परिषदेस येत होते. आता त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, खा. संजयकाका पाटील उपस्थित नव्हते. आ. अनिल बाबर अनेकदा आले होते, पण तेही यावेळी उपस्थित नव्हते. माजी आमदार सदाशिवराव पाटील सलग दोनवेळा आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक