शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

नागनाथअण्णा, तुमचं स्वप्न कधी साकार होणार? -: पाण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:37 IST

गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.

ठळक मुद्देत्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

अविनाश बाड ।आटपाडी : गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. तेलंगणा सरकारने तीन वर्षात जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना पूर्ण केली. पण २७ व्या पाणी परिषदेत दुष्काळग्रस्तांनो एकत्र या, असे आवाहन वारंवार केले गेले. त्यामुळे नागनाथअण्णा, दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचे तुमचे स्वप्न कधी साकार होणार, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांना पडला आहे.

या दुष्काळग्रस्त भागात येऊन क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी या थोर स्वातंत्र्यसैनिकाने हाक दिली. ११ जुलै १९९३ रोजी आटपाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली पाणी परिषद घेतली. खूप मोठ्या संख्येने लोक भवानी हायस्कूलच्या पटांगणात जमा झाले. चक्का जाम, मानवी साखळी, शेतसारा बंदी अशी अनेक अभिनव आंदोलने करण्यात आली. तत्कालीन शासनात असलेले आर. आर. पाटील, पतंगराव कदम, रामराजे नाईक-निंबाळकर, गणपतराव देशमुख मंत्रिपदी असताना परिषदेस हजर राहिले.२००० मध्येच लवादाच्या कराराची मुदत संपणार असल्याने, त्याआधी योजना पूर्ण करण्यासाठी रेटा लावला पाहिजे, या भूमिकेने दुष्काळग्रस्तांनी भवानी हायस्कूलचे पटांगण खचाखच भरून जात होते.

तेव्हा मंडपही दिला जात नव्हता आणि नागनाथअण्णा शासकीय विश्रामगृहासमोरील तंबूत मुक्काम ठोकायचे. हे सगळे आठवण्याचे कारण, बुधवारी झालेली पाणी परिषद. आता पहिल्याएवढे उंच व्यासपीठही बांधले जात नाही. केवळ मंडप होता, तरीही मंडपातील जागा रिकामी होती. पूर्वी तावातावाने बोलणारे वक्ते आता वयोमानपरत्वे धीराने-दमाने बोलत होते. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यासाठी एकत्रित आलेल्या काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली आहे.या परिषदेत आ. गणपतराव देशमुख, वैभव नायकवडी आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या भाषणाने जान आणली, पण मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी मांडलेला मुद्दा विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, आंध्र प्रदेशातून विभक्त झालेल्या तेलंगणा राज्याने ५०० टीएमसी पाणी उपसा करणारी सिंचन योजना अवघ्या तीन वर्षात पूर्ण केली. ४५ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारी ही जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे.पुढाऱ्यांनी फिरवली पाठ!क्रांतिवीर नागनाथअण्णांनी पुकारलेल्या लढ्यामुळेच टेंभू योजना साकारली. याआधीच्या अनेक पाणी परिषदांना उपस्थित राहणाºया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पाठ फिरवली आहे. तासगावमधून आर. आर. पाटील आमदार होते तेव्हा आणि मंत्री झाले, तरीही परिषदेस येत होते. आता त्यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, खा. संजयकाका पाटील उपस्थित नव्हते. आ. अनिल बाबर अनेकदा आले होते, पण तेही यावेळी उपस्थित नव्हते. माजी आमदार सदाशिवराव पाटील सलग दोनवेळा आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात कृष्णामाई आटपाडीत अवतरली, तेही परिषदेकडे फिरकले नाहीत.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक