शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

तरुणांच्या आयुष्याशी एमपीएससीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. उमेदीची पाच-सात वर्षे परीक्षेसाठी खर्ची घातल्यानंतरही यश न मिळाल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते. हे तरुण मग कुटुंबासाठी ओझे ठरतात.

एमपीएससी व यूपीएससीसाठी मान मोडून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, विटा आदी ठिकाणी त्यासाठीच्या अकादमीही सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या परीक्षांचा गोंधळ सुरू असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. वयाची तिशी पार केल्यानंतरही नोकरी नाही आणि लग्नही नाही, अशा कोंडीत ते सापडले आहेत. अनेक पालकांनी उधार-उसनवार करून मुलांना पैसे पुरविले. पुण्यात राहून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे परीक्षाही नाहीत आणि अभ्यासही नाही, अशी त्यांची कोंडी झाली आहे. काही तरुणांनी घरी परतून शेतीत लक्ष घातले आहे; पण स्पर्धा परीक्षेचे मोहजाल कायम आहे. वय निघून चालल्याने पालकही चिंतेत आहेत. काहींनी परीक्षा दिली आहे; पण निकाल नसल्याने चिंतेत आहेत.

बॉक्स

तरुणांना प्रतीक्षा परीक्षांच्या तारखांची

- एमपीएससीची मुख्य परीक्षा अद्याप व्हायची आहे. ती डिसेंबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे.

- पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दोन वर्षांपूर्वी झाली. निकालही जाहीर झाला; पण कोरोनामुळे प्रत्यक्ष मैदानावरील शारीरिक चाचण्या झालेल्या नाहीत.

बॉक्स

ऑनलाइन क्लासमधून तयारी कशी करायची?

१. लॉकडाऊनमुळे दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षा अकादमी कुलूपबंद आहेत. परजिल्ह्यातील विद्यार्थी अभ्यास थांबल्याने गावाकडे निघून गेले आहेत.

२. लॉकडाऊन लांबल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; पण निरर्थक ठरत असल्याचा अनुभव आला.

३. काही क्लासचालकांनी अभ्यासाचे व्हिडिओ, यूट्यूब चॅनलद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, विद्यार्थीदेखील ऑनलाइन संपर्कात आहेत, पण असे किती दिवस चालायचे? हा प्रश्न आहे.

शासनाने एमपीएससीसाठी निश्चित धोरण ठरवावे

- स्पर्धा परीक्षांविषयी शासनाने ठोस धोरण निश्चित केले पाहिजे. लोकसेवा आयोगात सदस्य नसल्याने कामकाज ठप्प आहे. शेवटची परीक्षा मार्चमध्ये झाली. तिची पहिली उत्तरावली आली, पण दुसरी उत्तरावली आणि अंतिम निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. मुख्य परीक्षाही अद्याप निश्चित नाही. हा खेळखंडोबा थांबला पाहिजे.

- प्रा. संजय सावळवाडे, सांगली, स्पर्धा परीक्षा शिक्षक

- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाच ते आठ वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी खर्ची पडतात. एखादी परीक्षा जाहीर होऊन निकाल लागणे आणि उत्तीर्णांना प्रत्यक्ष नियुक्त्या मिळणे यात सहा ते सात वर्षे जातात. शासनाने हा कालावधी एक ते दोन वर्षांचा केला पाहिजे. कर्ज काढून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासनाने खेळ करू नये. विद्यार्थ्यांनीही बी प्लॅन तयार ठेवावा.

डॉ. विक्रम पाटील, इस्लामपूर, स्पर्धा परीक्षा शिक्षक

वय निघून चालले, संधीही संपल्या

गेल्या मार्च महिन्यात प्रथम परीक्षा दिली. तिची पहिली चाचणी उत्तरपत्रिका जाहीर झाली, पण दुसरी उत्तरपत्रिका व अंतिम निकालाची कोणतीही हालचाल नाही. मुख्य परीक्षेविषयीदेखील एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. शासनाने हा खेळखंडोबा थांबविला पाहिजे. वेळापत्रक निश्चित नसल्याने अभ्यासाची दिशाही ठरविता येत नाही.

- स्वप्नील गायकवाड, स्पर्धा परीक्षार्थी, सांगली

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी दोन वर्षांपासून करीत आहे. त्यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वे किंवा अन्य परीक्षांकडे दुर्लक्ष करतो. एमपीएससीने व शासनाने धोरण निश्चित केल्यास आम्हाला धरसोड करावी लागणार नाही. अन्य परीक्षा देऊन चांगल्या नोकऱ्या मिळविता येतील. हा गोंधळ कधी थांबणार, याचीच चिंता आहे.

- रोहित कळेकर, स्पर्धा परीक्षार्थी, इस्लामपूर