शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

तरुणांच्या आयुष्याशी एमपीएससीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या तरुणांसाठी एमपीएससी म्हणजे चक्रव्यूह ठरत आहे. उमेदीची पाच-सात वर्षे परीक्षेसाठी खर्ची घातल्यानंतरही यश न मिळाल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते. हे तरुण मग कुटुंबासाठी ओझे ठरतात.

एमपीएससी व यूपीएससीसाठी मान मोडून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगाव, विटा आदी ठिकाणी त्यासाठीच्या अकादमीही सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत एमपीएससीच्या परीक्षांचा गोंधळ सुरू असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. वयाची तिशी पार केल्यानंतरही नोकरी नाही आणि लग्नही नाही, अशा कोंडीत ते सापडले आहेत. अनेक पालकांनी उधार-उसनवार करून मुलांना पैसे पुरविले. पुण्यात राहून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत. गेले वर्षभर कोरोना व लॉकडाऊनमुळे परीक्षाही नाहीत आणि अभ्यासही नाही, अशी त्यांची कोंडी झाली आहे. काही तरुणांनी घरी परतून शेतीत लक्ष घातले आहे; पण स्पर्धा परीक्षेचे मोहजाल कायम आहे. वय निघून चालल्याने पालकही चिंतेत आहेत. काहींनी परीक्षा दिली आहे; पण निकाल नसल्याने चिंतेत आहेत.

बॉक्स

तरुणांना प्रतीक्षा परीक्षांच्या तारखांची

- एमपीएससीची मुख्य परीक्षा अद्याप व्हायची आहे. ती डिसेंबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे.

- पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दोन वर्षांपूर्वी झाली. निकालही जाहीर झाला; पण कोरोनामुळे प्रत्यक्ष मैदानावरील शारीरिक चाचण्या झालेल्या नाहीत.

बॉक्स

ऑनलाइन क्लासमधून तयारी कशी करायची?

१. लॉकडाऊनमुळे दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षा अकादमी कुलूपबंद आहेत. परजिल्ह्यातील विद्यार्थी अभ्यास थांबल्याने गावाकडे निघून गेले आहेत.

२. लॉकडाऊन लांबल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; पण निरर्थक ठरत असल्याचा अनुभव आला.

३. काही क्लासचालकांनी अभ्यासाचे व्हिडिओ, यूट्यूब चॅनलद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, विद्यार्थीदेखील ऑनलाइन संपर्कात आहेत, पण असे किती दिवस चालायचे? हा प्रश्न आहे.

शासनाने एमपीएससीसाठी निश्चित धोरण ठरवावे

- स्पर्धा परीक्षांविषयी शासनाने ठोस धोरण निश्चित केले पाहिजे. लोकसेवा आयोगात सदस्य नसल्याने कामकाज ठप्प आहे. शेवटची परीक्षा मार्चमध्ये झाली. तिची पहिली उत्तरावली आली, पण दुसरी उत्तरावली आणि अंतिम निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. मुख्य परीक्षाही अद्याप निश्चित नाही. हा खेळखंडोबा थांबला पाहिजे.

- प्रा. संजय सावळवाडे, सांगली, स्पर्धा परीक्षा शिक्षक

- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाच ते आठ वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी खर्ची पडतात. एखादी परीक्षा जाहीर होऊन निकाल लागणे आणि उत्तीर्णांना प्रत्यक्ष नियुक्त्या मिळणे यात सहा ते सात वर्षे जातात. शासनाने हा कालावधी एक ते दोन वर्षांचा केला पाहिजे. कर्ज काढून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासनाने खेळ करू नये. विद्यार्थ्यांनीही बी प्लॅन तयार ठेवावा.

डॉ. विक्रम पाटील, इस्लामपूर, स्पर्धा परीक्षा शिक्षक

वय निघून चालले, संधीही संपल्या

गेल्या मार्च महिन्यात प्रथम परीक्षा दिली. तिची पहिली चाचणी उत्तरपत्रिका जाहीर झाली, पण दुसरी उत्तरपत्रिका व अंतिम निकालाची कोणतीही हालचाल नाही. मुख्य परीक्षेविषयीदेखील एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. शासनाने हा खेळखंडोबा थांबविला पाहिजे. वेळापत्रक निश्चित नसल्याने अभ्यासाची दिशाही ठरविता येत नाही.

- स्वप्नील गायकवाड, स्पर्धा परीक्षार्थी, सांगली

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी दोन वर्षांपासून करीत आहे. त्यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वे किंवा अन्य परीक्षांकडे दुर्लक्ष करतो. एमपीएससीने व शासनाने धोरण निश्चित केल्यास आम्हाला धरसोड करावी लागणार नाही. अन्य परीक्षा देऊन चांगल्या नोकऱ्या मिळविता येतील. हा गोंधळ कधी थांबणार, याचीच चिंता आहे.

- रोहित कळेकर, स्पर्धा परीक्षार्थी, इस्लामपूर