शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूर शाखा कालव्यातून ‘म्हैसाळ’चे पाणी खळाळले

By admin | Updated: April 13, 2015 00:01 IST

शेतकऱ्यांची बैठक : आठवड्यात जानराववाडी, खटावला आवर्तन

प्रवीण जगताप - लिंगनूर -सुरुवातीला म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर योजनेचे आवर्तन फक्त मुख्य कालव्यातून होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु लिंगनूर येथील शेतकऱ्यांची पाण्याच्या मागणी अर्जातील सकारात्मकता पाहून शाखा कालव्यांतूनही पाणी सोडण्याबाबत रविवारी निर्णय घेण्यात आला. लिंगनूर परिसरातील शेतकऱ्यांनीही शाखा व उपकालव्यांतून पाणी सोडणार असाल तर अर्ज भरू, अशी भूमिका घेऊन या संबंधित कालव्यावरील ४०० हेक्टर क्षेत्राचे अर्ज भरल्याने आज सकाळनंतर म्हैसाळचे पाणी लिंगनूर शाखा कालव्यांतून सोडण्यात येत आहे. या मागणी अर्जाबाबत व वितरणाच्या नियोजनाबाबत आज लिंगनूरमध्ये कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी लिंगनूर, संतोषवाडी, खटाव, आरग, माळवाडी परिसरातील शेतकरी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन आरग, माळवाडी, गायकवाडवाडी, लिंगनूर शाखा कालवा, मन्सूरवाडी भागातील कालव्यांत पाणी सोडले आहे. तसेच लिंगनूर परिसरातील ४०० हेक्टर क्षेत्राचे मागणी अर्ज जमा करण्यात आले. आजच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक व मागणी अर्जाबाबत सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले, तर पाण्याचे मागणी अर्ज न भरणाऱ्यांचे सोडलेल्या पाण्याबरोबरच मोजणी करणार असल्याचे अभियंता नलवडे यांनी या बैठकीत सांगितले, तर आठवडाभरात लिंगनूर शाखा कालव्यातून पाणी सोडून पुढे नंतर जानराववाडी, संतोषवाडी, खटाव येथील कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे.
या बैठकीस लिंगनूरचे कॉँग्रेस नेते आर. आर. पाटील, पोलीसपाटील मल्लय्या स्वामी, देवगोंडा पाटील, माजी सभापती मारुती नलवडे, आरगचे सर्जेराव खटावे, मन्सूरवाडीचे सुभाष खोत, संतोषवाडीचे हणमंत गायकवाड, बाळू गायकवाड यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


तीन कालव्यांतून प्रथमच पाणी
लिंगनूर शाखा कालव्यावरील कोळी गेट, मगदूमवाडी रस्त्याला छेदणारा उपकालवा, खटाव येथील बेडगे यांच्या वस्तीवरून पुढे जाणारा कालवा यातून प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. या तीन कालव्यांची कामे उशिराने पूर्ण झाल्याने आजपर्यंत यातून पाणी वाहिले नव्हते. पण या आवर्तनात या कलव्यांचा समावेश झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.



लिंगनूर मुख्य तलावात पाणी सोडण्याबाबतही चर्चा
शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी ‘लिंगनूर तलावाने गाठला तळ’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करून तलावाची घटलेली पाणीपातळी व उन्हाच्या दाहकतेचे चित्र स्पष्ट केले होते. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मुख्य तलावात पाणी सोडण्याकरिता दशलक्ष घनफुटाकरिता सुमारे १७ हजार रुपये पाणीपट्टी आकारून पाणी सोडण्याबाबत लिंगनूर तलावावर काम करणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने नसेना का, परंतु काही प्रमाणात म्हैसाळच्या पाण्याने हा मुख्य तलाव भरून घेण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.