शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट 

By अशोक डोंबाळे | Published: June 05, 2023 5:22 PM

आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

सांगली : पुणे-बंगळुरू हरित महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तसेच गायरानमधील रहिवासी अतिक्रमण भूमिहीन, शेतमजूर, कामगारांच्या वहिवाटीप्रमाणे नि:शुल्क नावे करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा आल्यानंतर प्रवेशद्वारात पोलिसांनी रोखला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट, शाब्दिक चकमकी उडाल्या.शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, ॲड. सुभाष पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. गायरान रहिवासी अतिक्रमणाच्या नोटिसा आलेल्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. मोर्चाची सुरुवात विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. जोरदार घोषणाबाजी करत भर उन्हात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.पोलिस अधिकाऱ्यांना आंदोलकांमध्ये वृद्ध महिला व लहान मुले असल्यामुळे त्यांना सावलीत बसू द्या, अशी विनंती केली. परंतु, पोलिसांनी ती विनंती नाकारली. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशद्वारातच रोखल्यामुळे आंदोलक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, शाब्दिक चकमकी उडाल्या. अखेर प्रवेशद्वारातच मोर्चातील शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, तहसीलदार यांनी गायरान रहिवासी अतिक्रमण घरे पाडण्यासाठी दिलेल्या नोटिसीला सामुदायिक उत्तर देण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. तसेच पुणे-बंगळुरू हरित महामार्ग बाधित क्षेत्राला एकरी दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.आंदोलनात बाबूराव लगारे, शरद पवार, प्रा. प्रल्हाद गायकवाड, विष्णू जाधव, नामदेव पाटील, प्रसाद खराडे, विश्वास साखरे, प्रवीण माळी, तानाजी चव्हाण आदींसह महिला आणि शेतकरी सहभागी होते.

महामार्गाबाधितांचा प्रश्न सोडविणारपुणे-बंगळुरू हरित महामार्गाबाबत संघर्ष समिती सोबत तातडीने बैठक घेणार असून तो प्रश्न सोडविण्यात येणार आहे. तसेच गायरान रहिवासी अतिक्रमणाबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडूनच घेतला जणार आहे, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गagitationआंदोलन