शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगावच्या संग्रामात लोकसभेची पेरणी -- कारण -राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:39 IST

जिल्ह्यात एकीकडं महापालिका निवडणुकीचा माहोल तयार होतोय, तर दुसरीकडं विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळं तर्कवितर्कांचं मोहोळ घोंघावू लागलंय

-श्रीनिवास नागेसांगली जिल्ह्यात एकीकडं महापालिका निवडणुकीचा माहोल तयार होतोय, तर दुसरीकडं विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळं तर्कवितर्कांचं मोहोळ घोंघावू लागलंय. तिथल्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी भाजपनं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल खेळली आणि नव्या समीकरणांचा पट मांडला जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघात काय होणार, असं वाटत असतानाच त्यांचे चिरंजीव विश्वजित यांना तेथून बिनविरोध निवडून द्यावं, असा मतप्रवाह पुढं आला. पतंगरावांचं अकाली निधन झाल्यानं विश्वजित यांच्यामागं सहानुभूती आहे. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीला वर्षभराचाच कालावधी उरला आहे. त्यामुळं काँग्रेसविरोधात सर्व पक्ष सबुरीनं घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

त्याप्रमाणं राष्टÑवादीनं उमेदवार न देण्याचं जाहीर केलं, पण बिनविरोधच्या चर्चेला भाजपनं खोडा घातला. १९९७ मध्ये तिथं तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संपतरावांचे पुतणे आणि आताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. त्यांनी स्वत: देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती सल देशमुखांना होती. त्यामुळंच आता कशासाठी कदम यांना ‘बाय’ द्यायचा, असा सवाल करून देशमुखांनी भाजपला निवडणूक लढवण्यास भाग पाडलंय. पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी भाजपचे नेते यावेळी थांबतील, असा होरा खोटा ठरतोय.

भाजप निवडणूक लढवणार, हे निश्चित होताना, उमेदवार कोण याची चर्चा जोरात सुरू झाली. कदम यांचे कट्टर विरोधक पृथ्वीराज देशमुख स्वत:च उतरतील, असं वाटत असतानाच भाजपनं धक्का दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काहीसं अनपेक्षितरित्या संग्रामसिंहांचं नाव पुढं केलं. संग्रामसिंह हे टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाºया संपतराव देशमुखांचे चिरंजीव. सध्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आणि जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद सांभाळताहेत. कडेगावच्या पलीकडं खटाव तालुक्यात गोपूज इथं त्यांनी खासगी साखर कारखाना उभारलाय.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम विरुद्ध जिल्हा परिषदेचं अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख अशी तगडी लढत इथं होऊ शकते. कदम आणि देशमुख घराण्यातली ही धाकटी पाती एकमेकांविरोधात उभी ठाकणार आहेत. काँग्रेस आणि भाजपसोबत कदम आणि देशमुख या दोन घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे... पण त्यासोबत नव्या राजकीय समीकरणांचा पटही मांडला जाणार आहे.

विधानसभेसाठी पृथ्वीराज देशमुखांनी स्वत: न उतरता संग्रामसिंहांचं नाव पुढं आणलंय. आता त्यांची पुढची चाल काय असेल, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यातील संघर्षात दडलंय.संजयकाका पक्षाचे खासदार आणि देशमुख जिल्हाध्यक्ष असूनही दोघांतून विस्तव जात नाही. दोघे एकमेकांची जिरवण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजयकाका आणि महसूलमंत्री तथा माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे तर विळ्याभोपळ्याचे सख्य. दादाही काकांच्या खच्चीकरणावर मेहनत घेताना दिसतात. महापालिका निवडणुकीत भाजपची सूत्रं आमदार सुधीर गाडगीळांना देताना काकांना मुद्दाम डावलणं, तासगावातील भाजप-राष्ट्रवादीच्या हाणामारीत काकांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी चाप बसवणं, असे फण्डे दादा वापरत असतात. काकांचं खासदारकीचं तिकीट कापायचं, असा चंगच त्यांनी बांधलाय. काकांना डावलून पृथ्वीराज देशमुखांना लोकसभेसाठी उतरवायचा डाव त्यांनी आखलाय. चालून आलेली ही संधी सोडण्यास देशमुख थोडेच साधूसंत आहेत!

जाता-जाता : संजयकाका पाटील खासदार असले तरी ते दिल्लीत म्हणावे तसे रमलेले नाहीत. त्यांना विधानसभा आणि मंत्रालय खुणावतंय. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या निकट जाण्याचा प्रयत्न सातत्यानं चालवलाय. काकांच्या नंतर राजकारणात आलेले बरेचजण मंत्री झालेत. मात्र आक्रमकता, संघर्षाची तयारी, अनुभव, राजकारणातील नेमक्या संधीचा अचूक अभ्यास ही वैशिष्ट्यं असूनही मंत्री व्हायचं त्यांना जमलेलं नाही. ही सुप्त इच्छा आपोआप फळास येण्याचा मार्ग खुला होताना काका आता विरोध करतील की गप्प राहतील..?

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण