शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

लोकमान्य टिळक हे राष्ट्राचे अमर आदर्श - मोहन भागवत

By शरद जाधव | Published: December 17, 2023 1:24 PM

मोहन भागवत; सांगलीत लो. टिळक स्मारक मंदिर शताब्दी वर्ष प्रारंभ कार्यक्रम

सांगली : माणूस ज्या स्थानावर पोहोचतो ते त्याच्यामुळे नव्हेतर त्याच्या आचरणामुळे पोहोचत असतो. देश हितासाठी कार्य करताना नेहमीच हीच भावना ठेवून लोकमान्य टिळकांनी त्या काळात काम केले. त्यांच्या याच विचारधारेचा आदर्श घेऊन देशहितासाठी प्राधान्य दिले गेले. टिळकांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात. त्यामुळेच लोकमान्य टिळक हेच राष्ट्राचे अमर असे आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले.

येथील लो. टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉ. भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले की, कोणतेही उद्दीष्ट मनात ठेवून कार्य केल्यास ती ध्येयप्राप्ती ही होतच असते. टिळकांचेही व्यक्तीमत्त्व असेच होते. त्यामुळे टिळकांचे देशहिताचे विचार तेव्हाही आणि आताही प्रेरणादायीच आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करतानाही डॉ. हेडगेवार यांच्यासमोर टिळकांचे विचार आदर्श होते. त्यांच्या आचरणातून शिकायला मिळाले असल्यानेही संघानेही देशहितासाठी कार्य केले. टिळकांनी स्वत:चा विचार न करता रूजवलेले विचार महत्वाचे होते. टिळकांचा काळ हा वेगळा असलातरी गुणसंपदेवर त्यांनी तो सार्थकी करून दाखविला होता. म्हणूनच त्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक आहेत. माणूस कधीही जूना होत नाही हेच यातून लक्षात येते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, स्मारक मंदिरच्या अध्यक्ष मनीषा काळे, प्रकाश बिरजे, विनायक काळे, श्रीहरी दाते, माणिकराव जाधव, माधव बापट, प्रकाश आपटे, सौरभ गोखले, अमृता गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMohan Bhagwatमोहन भागवतLokmanya Tilakलोकमान्य टिळक