शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Sangli: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग, ग्रामविकास विभागाने मागितली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:15 IST

सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय माहिती ग्रामविकास विभागाने मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने माहिती गोळा करून शासनाकडे पाठविली आहे.जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागाने तत्काळ मागितली आहे. त्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या निश्चित होणार आहे. काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झालेल्या आहेत. काही गावांचे तालुके बदललेले आहेत. काही गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आलेल्या आहेत. काही तालुक्यात ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आहेत. पुनर्वसनामुळे काही ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सद्यःस्थिती त्वरित मागितली आहे.जिल्ह्यातील संस्थांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासकराजला सुरुवात झालेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली, तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रभागरचनेची प्रक्रिया करण्याचे आयोगाचे पत्रसदस्यसंख्या निश्चिती, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी, त्यावर हरकती व सूचना मागविणे, सुनावणी, शिफारशीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढणे, त्यावरही हरकती, सूचना मागवून अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे, मतदार यादीचा कार्यक्रम व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करून प्रारूप प्रभागरचनेची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

तीस लाखांवर लोकसंख्या गेल्याचा अंदाज२०११ च्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या २,८ लाख २२ हजार १४३ होती. पुरुष १,४ लाख ३५ हजार ७२८ आणि महिला १,३ लाख ८६ हजार ४१५ होत्या. या लोकसंख्येत १४ वर्षांत किमान दोन लाखांनी वाढ होऊन ३० लाखांवर पोहोचली असण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या १४ वर्षांत जिल्ह्यात लोकसंख्या जनगणनाच झाली नाही.

चार आठवड्यांत अधिसूचना२०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवून चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना काढावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्यातालुका - लोकसंख्यामिरज - ८,५४,५८१वालवा - ४,५६,००२जाट - ३,२८,३२४तासगाव - २,५१,४०१खानापूर - १,७०,२१४पलूस - १,६४,९०९शिराळा - १,६२,९११कवठेमहांकाळ - १,५२,३२७कडेगाव - १,४३,०१९आटपाडी - १,३८,४५५

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024