शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग, ग्रामविकास विभागाने मागितली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:15 IST

सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

सांगली : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय माहिती ग्रामविकास विभागाने मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने माहिती गोळा करून शासनाकडे पाठविली आहे.जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागाने तत्काळ मागितली आहे. त्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या निश्चित होणार आहे. काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झालेल्या आहेत. काही गावांचे तालुके बदललेले आहेत. काही गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आलेल्या आहेत. काही तालुक्यात ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आहेत. पुनर्वसनामुळे काही ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सद्यःस्थिती त्वरित मागितली आहे.जिल्ह्यातील संस्थांवर डिसेंबर २०२१ पासून प्रशासकराजला सुरुवात झालेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली, तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रभागरचनेची प्रक्रिया करण्याचे आयोगाचे पत्रसदस्यसंख्या निश्चिती, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी, त्यावर हरकती व सूचना मागविणे, सुनावणी, शिफारशीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, आरक्षण निश्चितीसाठी सोडत काढणे, त्यावरही हरकती, सूचना मागवून अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे, मतदार यादीचा कार्यक्रम व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करून प्रारूप प्रभागरचनेची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

तीस लाखांवर लोकसंख्या गेल्याचा अंदाज२०११ च्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या २,८ लाख २२ हजार १४३ होती. पुरुष १,४ लाख ३५ हजार ७२८ आणि महिला १,३ लाख ८६ हजार ४१५ होत्या. या लोकसंख्येत १४ वर्षांत किमान दोन लाखांनी वाढ होऊन ३० लाखांवर पोहोचली असण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या १४ वर्षांत जिल्ह्यात लोकसंख्या जनगणनाच झाली नाही.

चार आठवड्यांत अधिसूचना२०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवून चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना काढावी लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्यातालुका - लोकसंख्यामिरज - ८,५४,५८१वालवा - ४,५६,००२जाट - ३,२८,३२४तासगाव - २,५१,४०१खानापूर - १,७०,२१४पलूस - १,६४,९०९शिराळा - १,६२,९११कवठेमहांकाळ - १,५२,३२७कडेगाव - १,४३,०१९आटपाडी - १,३८,४५५

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024