शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य हे सर्वाधिक सशक्त माध्यम

By admin | Updated: December 26, 2016 23:03 IST

भास्कर चंदनशिव : बेळंकीमध्ये तिसरे इरादा ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : माणसामधील माणुसकीची जाणीव करून देण्याची ताकद साहित्यात असते. आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या वेदना, भोग मांडण्यासाठी साहित्याइतके सशक्त माध्यम कोणतेही नाही. त्यामुळे साहित्य हे वेदनेतूनच साकारते. जगावे कसे आणि वागावे कसे हे माणसाला सांगण्याचे काम साहित्यातून होत असल्याने, सुसंस्कारित समाजाच्या निर्मितीसाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी रविवारी केले. बेळंकी (ता. मिरज) येथील इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या इरादा ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून चंदनशिव बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, विधानभवनातील मुख्य माहिती व संशोधन अधिकारी बा. बा. वाघमारे व ज्येष्ठ नाट्यकर्मी राजेंद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. चंदनशिव पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे साहित्य माणसाला जगणे शिकविते, अगदी त्याप्रमाणेच साहित्य माणसाला शहाणपण शिकविते, जगण्याच्या माध्यमाची जाणीवही करून देते. त्या-त्या भागातील वेदना प्रभावीपणे मांडण्यात साहित्य आपली भूमिका पार पाडतच आहे. साहित्याच्या जाणिवा जिवंत राहाव्यात यासाठी प्रत्येकानेच आपल्यात बदल करणे आवश्यक आहे. आपल्या राज्याचा विचार केला, तर राज्य विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे विभागले गेले आहे. मात्र, साहित्यात इतकी ताकद आहे की, ते कुठेही विभागले गेलेले नाही. स्वागताध्यक्ष बा. बा. वाघमारे, राजेंद्र पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘रंग नात्याचे... साहित्याच्या कुंचल्यातून’ या विषयावरील परिसंवादात बोलताना, नात्यांतील पैलू काही करूनही सापडत नसल्याने नाटकासारख्या माध्यमातून हे मांडताना कसोटीचा क्षण असतो. त्यामुळे निनावी नातेच अधिक भावत असल्याचे प्रतिपादन इरफान मुजावर यांनी केले. तसेच कथा, कादंबरी आणि कवितांतून मांडल्या जाणाऱ्या नातेसंबंधावर अत्यंत प्रभावीपणे साहित्यिका डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी आपले मत मांडले. संमेलनाचे संयोजन ‘इरादा’चे रवींद्र कुंभार, मदन जाधव, नागेश गायकवाड, अजित कुंडले, शरद गायकवाड, माधुरी माळी यांच्यासह ‘इरादा’च्या सदस्यांनी केले. (प्रतिनिधी)वैविध्यपूर्ण सत्रामुळे : संमेलनात रंगतअ‍ॅड. योगेश मोरे यांनी ‘सशक्त आणि समृध्द समाज उभारणीत युवकांचे योगदान’ यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी ‘माझे जीवन, माझा संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन केले. लता ऐवळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यात रमजान मुल्ला, विकास चव्हाण, सचिन माळी, चंद्रकांत देशमुखे, चंद्रकांत वेल्हाळ, प्रतिभा जगदाळे, अभिजित पाटील यांनी कविता सादर केल्या. शांतिनाथ मांगले यांचे कथाकथनही झाले. समारोप कार्यक्रमाला कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.अभिनेता दिग्विजय रोहिदासचा सक्सेस पासवर्डसंमेलनात चित्रपट अभिनेता दिग्विजय रोहिदास याची मुलाखत रवींद्र कुंभार यांनी घेतली. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ विचार न करता, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा, यश तुमचेच असेल, असा यशाचा कानमंत्रच त्याने यावेळी दिला.बेळंकी (ता. मिरज) येथे आयोजित इरादा साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चित्रपट अभिनेते दिग्विजय रोहिदास, ज्येष्ठ नाट्यकर्मी राजेंद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.