शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी चौकशी करून मदत देऊ, कृषिमंत्री दादा भुसेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 5:02 PM

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल.

भिलवडी : मुदत संपून गेल्यानंतरही परिपक्व न झालेल्या सांगली जिल्ह्यासह, राज्यातील उन्हाळी सोयाबीन बियाणेप्रकरणी सखोल चौकशी करून मदत देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बुधवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस कृषी विभाग, महाबीजचे सर्व अधिकारी, धनगाव (ता. पलुस) येथील शेतकरी उपस्थित होते.

सांगलीसह अन्य जिल्ह्यांतही यावर्षी महाबीजमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना केडीएस ७२६ जातीचे बियाणे दिले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या सोयाबीन पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.

निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणामुळे झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाईल. याबाबत सखोल अभ्यास करून समिती शासनाकडे अहवाल सादर करील व त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रदीप साळुंखे, शरद साळुंखे, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, दीपक भोसले आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरी