शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वाकुर्डे पाणी उपसा योजनेच्या गळतीने ५०० एकर क्षेत्राला धोका; आवर्तनावरून 'या' दोन तालुक्यात संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:35 IST

पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

शिराळा : वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या सिंचन आवर्तनावरून सध्या शिराळा व वाळवा तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यासाठी मागणी करत असताना, दुसरीकडे कालवा गळतीमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून पेचात पडले आहेत.वाकुर्डे बुद्रुक करमजाई तलाव ते मानकरवाडी या दरम्यान असलेल्या ३ किलोमीटरच्या कालव्याला मोठी गळती आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार, या गळतीमुळे परिसरातील सुमारे ५०० एकर शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या शेतात ऊस, पावटा, मका यांसारखी पिके उभी आहेत. पाणी सोडल्यास ही पिके कुजून मोठे नुकसान होईल, असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे.‘‘जोपर्यंत गळती प्रतिबंधक काम सुरू होत नाही, तोपर्यंत पाणी सोडू देणार नाही’’, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शिराळा व वाळवा तालुक्यातील निगडी, पाडळी, आवंढी, खेड, रेड, बेलदारवाडी, कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, रेठरे धरण, ओझर्डे, सुरूल, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी, शिवपुरी आदी गावांना पाण्याची तीव्र गरज असून त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, वाकुर्डे येथील गळतीबाधित शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे आवर्तन लांबणीवर पडले आहे. सध्या करमजाई तलाव पूर्ण भरला असून योजनेचे पंप सुरू आहेत. मात्र, मुख्य कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने तलावातील पाणी सांडव्यावरून शिराळा येथील मोरणा प्रकल्पात वळवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तो अद्याप यशस्वी झालेला नाही.

करमजाई तलाव ते मानकरवाडी दरम्यानच्या ३ किमी कालव्याच्या गळतीमुळे ५०० एकर जमिनीवर संकट ओढवले आहे. पाणी सोडल्यास ऊस, पावटा आणि मका ही पिके तर वाया जातीलच, पण आगामी पावसाळ्यामुळे ही जमीन वर्षभर पडून राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा घाला पडणार आहे. - निवृत्ती शेटके, शेतकरी, वाकुर्डे बुद्रुक 

या योजनेचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कालव्याच्या गळतीमुळे करमजाई तलाव ते मानकरवाडी येथील पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास विरोध होत आहे. जलसंपदा विभागाचे कर्मचारी व अधिकारी गेले तीन दिवस शेतकऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक शेतकरी गळती प्रतिबंधक काम सुरू झाल्याशिवाय पाणी सोडू देणार नाही, या मागणीवर ठाम आहेत. - एन. टी. पोतदार, कार्यकारी अभियंता.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Irrigation Leak Threatens Farms; Water Dispute Erupts.

Web Summary : Leakage in the Vakurde irrigation project threatens 500 acres. Shirala and Walwa farmers clash over water allocation amid demands and crop damage fears. Officials are trying to resolve the deadlock.