शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:59 IST

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला २००५, २०१९, २०२१ च्या महापुरानंतरही जिल्ह्यातील खासदार, आमदार अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यावर काहीही बोलत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विरोध करत नसल्यामुळे सांगलीकरांना महापुराचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणत्याच हालचाली नाहीत, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी केंद्रीय जलआयोगाला पाच हजार पत्रं पाठविणार आहे, असेही ते म्हणाले.सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, ओंकार दिवाण, हेमंत बावलेकर, दिनकर पवार, विजयकुमार खटावकर आदी उपस्थित होते.सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र प्रदेश सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २००० मध्ये आंध्र प्रदेश राज्याने हरकत घेतली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धरणाच्या दरवाजाची उंची कमी करून ५१९.६० मीटर ठेवण्याचे आदेश दिले. पुढील पर्यावरणाची परवानगी घेऊन तसेच जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घेऊन उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत उत्तर दिले. याकडे दुर्लक्ष करून कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. अधिसूचना निघावी म्हणून केंद्र शासनाकडे बैठकीची मागणी केली. कर्नाटक सरकारचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूरकी आयआयटी महाविद्यालयाकडून अलमट्टी धरणाच्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत. तरीही दोन वर्षात अहवाल मिळत नाही. म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे पाच हजार तक्रारी केंद्रीय जलआयोग, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यावरण विभाग, जलशक्ती मंत्रालय व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?पूर येऊ नये, यासाठी आम्ही काम करत आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर येण्याची वाटप बघतात की काय, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच हालचाली दिसत नाहीत, असा आरोपही सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र