शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:59 IST

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला २००५, २०१९, २०२१ च्या महापुरानंतरही जिल्ह्यातील खासदार, आमदार अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यावर काहीही बोलत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विरोध करत नसल्यामुळे सांगलीकरांना महापुराचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणत्याच हालचाली नाहीत, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी केंद्रीय जलआयोगाला पाच हजार पत्रं पाठविणार आहे, असेही ते म्हणाले.सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, ओंकार दिवाण, हेमंत बावलेकर, दिनकर पवार, विजयकुमार खटावकर आदी उपस्थित होते.सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र प्रदेश सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २००० मध्ये आंध्र प्रदेश राज्याने हरकत घेतली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धरणाच्या दरवाजाची उंची कमी करून ५१९.६० मीटर ठेवण्याचे आदेश दिले. पुढील पर्यावरणाची परवानगी घेऊन तसेच जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घेऊन उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत उत्तर दिले. याकडे दुर्लक्ष करून कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. अधिसूचना निघावी म्हणून केंद्र शासनाकडे बैठकीची मागणी केली. कर्नाटक सरकारचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूरकी आयआयटी महाविद्यालयाकडून अलमट्टी धरणाच्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत. तरीही दोन वर्षात अहवाल मिळत नाही. म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे पाच हजार तक्रारी केंद्रीय जलआयोग, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यावरण विभाग, जलशक्ती मंत्रालय व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?पूर येऊ नये, यासाठी आम्ही काम करत आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर येण्याची वाटप बघतात की काय, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच हालचाली दिसत नाहीत, असा आरोपही सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र