शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:59 IST

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?

सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला २००५, २०१९, २०२१ च्या महापुरानंतरही जिल्ह्यातील खासदार, आमदार अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यावर काहीही बोलत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विरोध करत नसल्यामुळे सांगलीकरांना महापुराचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणत्याच हालचाली नाहीत, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी केंद्रीय जलआयोगाला पाच हजार पत्रं पाठविणार आहे, असेही ते म्हणाले.सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, ओंकार दिवाण, हेमंत बावलेकर, दिनकर पवार, विजयकुमार खटावकर आदी उपस्थित होते.सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र प्रदेश सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २००० मध्ये आंध्र प्रदेश राज्याने हरकत घेतली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धरणाच्या दरवाजाची उंची कमी करून ५१९.६० मीटर ठेवण्याचे आदेश दिले. पुढील पर्यावरणाची परवानगी घेऊन तसेच जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घेऊन उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत उत्तर दिले. याकडे दुर्लक्ष करून कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. अधिसूचना निघावी म्हणून केंद्र शासनाकडे बैठकीची मागणी केली. कर्नाटक सरकारचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूरकी आयआयटी महाविद्यालयाकडून अलमट्टी धरणाच्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत. तरीही दोन वर्षात अहवाल मिळत नाही. म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे पाच हजार तक्रारी केंद्रीय जलआयोग, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यावरण विभाग, जलशक्ती मंत्रालय व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?पूर येऊ नये, यासाठी आम्ही काम करत आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर येण्याची वाटप बघतात की काय, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच हालचाली दिसत नाहीत, असा आरोपही सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र